शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

बालासोर अपघातप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र; तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 07:52 IST

बालासोर येथील रेल्वे अपघातात २९६ लोकांचा मृत्यू झाला, तर १२०० लोक जखमी झाले होते.

बालासोर : ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातप्रकरणी अटक केलेल्या तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर सीबीआयने शनिवारी आरोपपत्र दाखल केले. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवला आहे.

बालासोर येथील रेल्वे अपघातात २९६ लोकांचा मृत्यू झाला, तर १२०० लोक जखमी झाले होते. या प्रकरणी सीबीआयने सीनिअर सेक्शन इंजिनिअर अरुणकुमार महंता, सीनिअर सेक्शन इंजिनिअर आमीर खान, टेक्निशिअन पप्पूकुमार या तिघांना अटक केली होती. हे तिघेजण बालासोर जिल्ह्यात रेल्वे यंत्रणेत कार्यरत होते. कोरोमंडल एक्स्प्रेसने एका मालवाहू रेल्वेला धडक दिली. त्यामुळे रुळावरून घसरलेल्या डब्यांना समोरुन येणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसने धडक दिली होती.

भुवनेश्वर येथील जिल्हा विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले. बालासोरमध्ये झालेल्या या अपघात प्रकरणातील तीन आरोपींकडे रेल्वे सिग्नल यंत्रणा व्यवस्थित राखण्याची जबाबदारी होती. त्यात त्यांनी हलगर्जीपणा केला, असेही आरोपपत्रात सीबीआयने म्हटले आहे.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात