शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

बालासोर अपघातप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र; तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 07:52 IST

बालासोर येथील रेल्वे अपघातात २९६ लोकांचा मृत्यू झाला, तर १२०० लोक जखमी झाले होते.

बालासोर : ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातप्रकरणी अटक केलेल्या तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर सीबीआयने शनिवारी आरोपपत्र दाखल केले. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवला आहे.

बालासोर येथील रेल्वे अपघातात २९६ लोकांचा मृत्यू झाला, तर १२०० लोक जखमी झाले होते. या प्रकरणी सीबीआयने सीनिअर सेक्शन इंजिनिअर अरुणकुमार महंता, सीनिअर सेक्शन इंजिनिअर आमीर खान, टेक्निशिअन पप्पूकुमार या तिघांना अटक केली होती. हे तिघेजण बालासोर जिल्ह्यात रेल्वे यंत्रणेत कार्यरत होते. कोरोमंडल एक्स्प्रेसने एका मालवाहू रेल्वेला धडक दिली. त्यामुळे रुळावरून घसरलेल्या डब्यांना समोरुन येणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसने धडक दिली होती.

भुवनेश्वर येथील जिल्हा विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले. बालासोरमध्ये झालेल्या या अपघात प्रकरणातील तीन आरोपींकडे रेल्वे सिग्नल यंत्रणा व्यवस्थित राखण्याची जबाबदारी होती. त्यात त्यांनी हलगर्जीपणा केला, असेही आरोपपत्रात सीबीआयने म्हटले आहे.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात