शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

साप आणि अजगरांकडून बदलला जातोय भारतीय रेल्वेचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:17 IST

साप आणि अजगर रेल्वेच्या या धारणेला बदलण्यासाठी क्रांतीकारीपद्धतीने मदत करत आहेत.

ठळक मुद्देसाप आणि अजगर रेल्वेच्या या धारणेला बदलण्यासाठी क्रांतीकारीपद्धतीने मदत करत आहेत. उत्तर रेल्वेच्या 'पायथन', सेंट्रल रेल्वेच्या 'मारूती' आणि पश्चिम रेल्वेच्या 'अॅनाकोंडा' या साप आणि अजगरांची नावं असलेल्या तिन्ही रेल्वेतून जलदगतीने सामानांची ने-आण करायला मदत होत आहे

आग्रा, दि. 25- भारतीय रेल्वे खरं त्यांच्या लेटलतिफ कारभारामुळे ओळखली जाते. भारतीय रेल्वेच्या गाडी कधीच वेळेवर नसतात अशी ओरडही लोकांकडून येत असते. पण आता साप आणि अजगर रेल्वेच्या या धारणेला बदलण्यासाठी क्रांतीकारीपद्धतीने मदत करत आहेत. उत्तर रेल्वेच्या 'पायथन', सेंट्रल रेल्वेच्या 'मारूती' आणि पश्चिम रेल्वेच्या 'अॅनाकोंडा' या साप आणि अजगरांची नावं असलेल्या तिन्ही रेल्वेतून जलदगतीने सामानांची ने-आण करायला मदत होत आहे. तसंच या रेल्वेचा खर्चही खूप कमी असल्याने तो रेल्वेला परवडण्यासारखा असून या तिन्ही रेल्वेमुळे रेल्वेची बचतच होत असल्याने भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलत असल्याचं रेल्वे सुत्रांचं म्हणणं आहे.

सामानांची वाहतूक करणाऱ्या या मालगाड्यांची लांबी १.४ किलोमीटर आहे तसंच त्यात जवळपास ११८ बोगी आहेत. या प्रकारच्या प्रत्येक ट्रेनमध्ये दोन रॅक (58 वॅगन), दोन ब्रेक वॅन आणि दोन ते तीन इंजिन आहेत. या ट्रेन कुठेही न थांबता वेगाने धावत असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

रेल्वे अॅक्शन प्लान २०१७-१८ मध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे.  या रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्यात येणार आहे, असं, आग्रा डिव्हिजनचे विभागीय व्यवस्थापक संचित त्यागी यांनी सांगितलं आहे. काही वर्षापूर्वीच लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या सरासरी १५ ते २५ लांबपल्ल्याच्या गाड्या चालविल्या जात आहेत. मार्च २०१८ पर्यंत ही संख्या ५० पर्यंत जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते आहे. 

 या ट्रेन चालविण्यासाठी लूप लाइनची आवश्यकता असते. अशा तीन लूप लाइन तयार करण्यात आल्या आहेत.  संपूर्ण देशात अशा १०९ लूप लाइन तयार करण्याची परवानगी मिळाली असल्याचंही संचित त्यागी यांनी सांगितलं आहे. या ट्रेन खूप लांब असून जास्त वेगाने धावत असल्याने त्यांची नावं सापांवरून ठेवण्यात आल्याचंही संचित त्यागी यांनी सांगितलं आहे.