शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साप आणि अजगरांकडून बदलला जातोय भारतीय रेल्वेचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:17 IST

साप आणि अजगर रेल्वेच्या या धारणेला बदलण्यासाठी क्रांतीकारीपद्धतीने मदत करत आहेत.

ठळक मुद्देसाप आणि अजगर रेल्वेच्या या धारणेला बदलण्यासाठी क्रांतीकारीपद्धतीने मदत करत आहेत. उत्तर रेल्वेच्या 'पायथन', सेंट्रल रेल्वेच्या 'मारूती' आणि पश्चिम रेल्वेच्या 'अॅनाकोंडा' या साप आणि अजगरांची नावं असलेल्या तिन्ही रेल्वेतून जलदगतीने सामानांची ने-आण करायला मदत होत आहे

आग्रा, दि. 25- भारतीय रेल्वे खरं त्यांच्या लेटलतिफ कारभारामुळे ओळखली जाते. भारतीय रेल्वेच्या गाडी कधीच वेळेवर नसतात अशी ओरडही लोकांकडून येत असते. पण आता साप आणि अजगर रेल्वेच्या या धारणेला बदलण्यासाठी क्रांतीकारीपद्धतीने मदत करत आहेत. उत्तर रेल्वेच्या 'पायथन', सेंट्रल रेल्वेच्या 'मारूती' आणि पश्चिम रेल्वेच्या 'अॅनाकोंडा' या साप आणि अजगरांची नावं असलेल्या तिन्ही रेल्वेतून जलदगतीने सामानांची ने-आण करायला मदत होत आहे. तसंच या रेल्वेचा खर्चही खूप कमी असल्याने तो रेल्वेला परवडण्यासारखा असून या तिन्ही रेल्वेमुळे रेल्वेची बचतच होत असल्याने भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलत असल्याचं रेल्वे सुत्रांचं म्हणणं आहे.

सामानांची वाहतूक करणाऱ्या या मालगाड्यांची लांबी १.४ किलोमीटर आहे तसंच त्यात जवळपास ११८ बोगी आहेत. या प्रकारच्या प्रत्येक ट्रेनमध्ये दोन रॅक (58 वॅगन), दोन ब्रेक वॅन आणि दोन ते तीन इंजिन आहेत. या ट्रेन कुठेही न थांबता वेगाने धावत असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

रेल्वे अॅक्शन प्लान २०१७-१८ मध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे.  या रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्यात येणार आहे, असं, आग्रा डिव्हिजनचे विभागीय व्यवस्थापक संचित त्यागी यांनी सांगितलं आहे. काही वर्षापूर्वीच लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या सरासरी १५ ते २५ लांबपल्ल्याच्या गाड्या चालविल्या जात आहेत. मार्च २०१८ पर्यंत ही संख्या ५० पर्यंत जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते आहे. 

 या ट्रेन चालविण्यासाठी लूप लाइनची आवश्यकता असते. अशा तीन लूप लाइन तयार करण्यात आल्या आहेत.  संपूर्ण देशात अशा १०९ लूप लाइन तयार करण्याची परवानगी मिळाली असल्याचंही संचित त्यागी यांनी सांगितलं आहे. या ट्रेन खूप लांब असून जास्त वेगाने धावत असल्याने त्यांची नावं सापांवरून ठेवण्यात आल्याचंही संचित त्यागी यांनी सांगितलं आहे.