शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

साप आणि अजगरांकडून बदलला जातोय भारतीय रेल्वेचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:17 IST

साप आणि अजगर रेल्वेच्या या धारणेला बदलण्यासाठी क्रांतीकारीपद्धतीने मदत करत आहेत.

ठळक मुद्देसाप आणि अजगर रेल्वेच्या या धारणेला बदलण्यासाठी क्रांतीकारीपद्धतीने मदत करत आहेत. उत्तर रेल्वेच्या 'पायथन', सेंट्रल रेल्वेच्या 'मारूती' आणि पश्चिम रेल्वेच्या 'अॅनाकोंडा' या साप आणि अजगरांची नावं असलेल्या तिन्ही रेल्वेतून जलदगतीने सामानांची ने-आण करायला मदत होत आहे

आग्रा, दि. 25- भारतीय रेल्वे खरं त्यांच्या लेटलतिफ कारभारामुळे ओळखली जाते. भारतीय रेल्वेच्या गाडी कधीच वेळेवर नसतात अशी ओरडही लोकांकडून येत असते. पण आता साप आणि अजगर रेल्वेच्या या धारणेला बदलण्यासाठी क्रांतीकारीपद्धतीने मदत करत आहेत. उत्तर रेल्वेच्या 'पायथन', सेंट्रल रेल्वेच्या 'मारूती' आणि पश्चिम रेल्वेच्या 'अॅनाकोंडा' या साप आणि अजगरांची नावं असलेल्या तिन्ही रेल्वेतून जलदगतीने सामानांची ने-आण करायला मदत होत आहे. तसंच या रेल्वेचा खर्चही खूप कमी असल्याने तो रेल्वेला परवडण्यासारखा असून या तिन्ही रेल्वेमुळे रेल्वेची बचतच होत असल्याने भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलत असल्याचं रेल्वे सुत्रांचं म्हणणं आहे.

सामानांची वाहतूक करणाऱ्या या मालगाड्यांची लांबी १.४ किलोमीटर आहे तसंच त्यात जवळपास ११८ बोगी आहेत. या प्रकारच्या प्रत्येक ट्रेनमध्ये दोन रॅक (58 वॅगन), दोन ब्रेक वॅन आणि दोन ते तीन इंजिन आहेत. या ट्रेन कुठेही न थांबता वेगाने धावत असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

रेल्वे अॅक्शन प्लान २०१७-१८ मध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे.  या रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्यात येणार आहे, असं, आग्रा डिव्हिजनचे विभागीय व्यवस्थापक संचित त्यागी यांनी सांगितलं आहे. काही वर्षापूर्वीच लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या सरासरी १५ ते २५ लांबपल्ल्याच्या गाड्या चालविल्या जात आहेत. मार्च २०१८ पर्यंत ही संख्या ५० पर्यंत जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते आहे. 

 या ट्रेन चालविण्यासाठी लूप लाइनची आवश्यकता असते. अशा तीन लूप लाइन तयार करण्यात आल्या आहेत.  संपूर्ण देशात अशा १०९ लूप लाइन तयार करण्याची परवानगी मिळाली असल्याचंही संचित त्यागी यांनी सांगितलं आहे. या ट्रेन खूप लांब असून जास्त वेगाने धावत असल्याने त्यांची नावं सापांवरून ठेवण्यात आल्याचंही संचित त्यागी यांनी सांगितलं आहे.