शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

लोकांच्या विचारपद्धतीत बदल हे मोदी सरकारचे मोठे योगदान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीत झालेला आमूलाग्र बदल होय.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीत झालेला आमूलाग्र बदल होय. भारताला जागतिक शक्ती बनविण्यासाठी सर्वच क्षेत्रात सशक्त करीत नव भारताची उभारणी करण्यासाठी मोदी सरकारची ‘ब्रँड इंडिया’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना होय, असे स्पष्ट करीत भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांनी मोदी सरकारने घेतलेले धोरणात्मक निर्णय, सुरू केलेल्या योजना आणि कार्यक्रमाच्या यशाचा लेखाजोखा मांडत सरकारच्या कामगिरीची प्रशंसा केली.ते नवी दिल्लीत ‘फिक्की’च्या राष्टÑीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. फिक्कीने या संधीचा लाभ घेत भारतीय व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेचा विकास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.अल्पावधीच्या फायद्यापेक्षा भाजपचा दीर्घावधीतील फायद्यावर भर आहे. सुधारणा प्रक्रियेतून राष्टÑ परिवर्तन घडविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या तीन वर्षांत प्रत्यक्ष करदात्यांची संख्या ३.७ कोटींवरून ६.४ टक्के झाली. ३० कोटी नवीन बँक खाते उघडून सरकारने औपाचारिक अर्थव्यवस्थेचा पाय विस्तृत केला. २०१४ मध्ये ८.५ कोटी लोकांना थेट लाभ हस्तांतरणाचा लाभ मिळत होता. ही संख्या आता ३६ कोंटीवर गेली आहे. आधी ५९ हजार कोटी रुपयांची सबसिडी भ्रष्टाचारातून गायब व्हायची. रोजगार मागण्याऐवजी रोजगार निर्माण करणारी तरुण पिढी निर्माण करणाºया मुद्रा योजनेचा सात कोटी लोकांना लाभ झाला.२०१४ पूर्वी दहा वर्षे काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकारचे होते. तेव्हा जीडीपी ४.७ टक्के होता. चालू खात्यातील वित्तीय तूट ५ टक्के होती. तसेच महागाईचा दर दुहेरी अंकात होता. त्या तुलनेत मागील तीन वर्षांत निर्णायक धोरण तयार करण्यावर भर देण्यात आला. सुधारणांबाबत मोदी सरकारचा दृष्टिकोन दीर्घावधीचा आहे. ३० वर्षांपर्यत स्थिर धोरण ठेवण्याचा आमचा मानस आहे, असेही ते म्हणाले. मोदी सरकारने जीडीपीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला आहे. उत्पादन, सेवा आणि पायाभूत सोयी पुरताच जीडीपी मर्यादित नाही. जीवनमानाचा दर्जा आणि सामाजिक भांडवली गुणवत्तेत सुधारणा करणे, याचाही यात समावेश आहे. गरिबांना एलपीजीचे कनेक्शन, प्रत्येक घरात वीज, प्रत्येकाचे बँक खाते आणि नवीन शौचालय उभारण्यात आल्याने जीडीपीत वाढ होण्यात मदत झाली आहे.जीएसटीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, पुढील दहा वर्षांत त्याचे फायदे दिसून येतील. पूर्वी वेगवेगळे १७ कर होते. आता मात्र जीएसटीमुळे एक राष्टÑ, एक कर प्रणाली आली आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर काळापैसा आला आहे. त्याचा उपयोग जनतेच्या फायद्यासाठी केला जाणार आहे. मॉरिशस, सायप्रस आणि सिंगापूरमधून येणाºया काळ्या पैशांचा ओघही आम्ही थांबवला आहे. बांगलादेशसोबत झालेल्या ऐतिहासिक भू-सीमा कराराचाही त्यांनी उल्लेख केला. फिक्की आणि उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाºया संघटनांनी संशोधन आणि विकास क्षेत्रात गुंतवणूक करून स्वत:ची बौद्धिक संपदा निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी भारतीय उद्योगजगताला केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाह