शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा; 'दीदीं'ना वेगळाच संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 17:49 IST

'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे.

कोलकाता: भारताचे महत्वाकांक्षी चांद्रयान- 2 अखेर चंद्राच्या जवळ पोहचले असून शनिवारी  (7 सप्टेंबर) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून हे इतिहास रचणार आहे. मात्र 'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे.

 'चांद्रयान-2'च्या लँडिंग होण्यास काही तास बाकी असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शुक्रवारी) मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मोदी सरकार  चांद्रयान- 2 मिशनची अशी जाहीरात करत आहेत जसे यापूर्वी भारताने कोणतीही आंतराळ मोहीम केली नाही. देशात आर्थिक मंदीचे उभे राहीलेले संकट लपविण्यासाठी केंद्र सरकार चांद्रयान-2चा वापर करत असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेवर बोलताना न्यायव्यवस्था आपले काम करेलच, परंतु भाजपा सरकारने चिदंबरम यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी होती असे मत त्यांनी कोलकात्तामध्ये एका भाषणात मांडले आहे.

भारताच्या इतिहासात आजची मध्यरात्र सुवर्णक्षरांनी लिहिली जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोनं पाठवलेलं 'चांद्रयान-2' आज मध्यरात्री १.३० ते २.३०च्या सुमारास चंद्रावर लँड होणार आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नागरिकांना हा अनुपम्य सोहळा पाहण्याचं आवाहन केलंय. चांद्रयानाचं लँडिंग पाहतानाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करा, मी त्यातले काही रिट्विट करेन, असंही त्यांनी जाहीर केलंय.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीisroइस्रो