शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

Chandrayaan-2: ...त्यामुळे चंद्रावर उतरताना विक्रम लँडर झाला क्रॅश, प्राथमिक तपासातून मिळाले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 09:37 IST

चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली होती. मात्र त्यानंतरही विक्रमशी संपर्क साधला जाईल अशी आशा देशाला होती. मात्र...

ठळक मुद्देऑटोमॅटिक लँडिंग प्रोग्रॅममध्ये झालेल्या गडहडीमुळे विक्रम लँडरला अपघात झाला असावाविक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणे हे अशक्यप्राय झाले असल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली

बंगळुरू -  चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली होती. मात्र त्यानंतरही विक्रमशी संपर्क साधला जाईल अशी आशा देशाला होती. मात्र विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणे हे अशक्यप्राय झाले असल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर काही वेळातच लूनर क्राफ्ट क्रॅश लँडिंगनंतर पूर्णपणे नष्ट झाल्याचा अंदाज इस्रोच्या शास्त्रज्ञांना आला होता. दरम्यान, ऑटोमॅटिक लँडिंग प्रोग्रॅममध्ये झालेल्या गडहडीमुळे विक्रम लँडरला अपघात झाला असावा, असा अंदाज विक्रमला लँडिंगदरम्यान आलेल्या अपयशचा तपास करत असलेल्या टीमने वर्तवला आहे.   इस्रोमधील माहितगारांनी सांगितले की, ''1 हजार 471 किलोग्रॅम वजनाचा विक्रम लँडर आणि त्याच्यासोबत असलेला 27 किलो वजनाचा रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्टभागापासून काही अंतरावर असताना दुर्घटनाग्रस्त झाला. त्यानंतर विक्रमबाबत आतापर्यंत केलेल्या अभ्यासामधून विक्रम पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता फारच कमी आहे.'' दरम्यान, क्रॅश लँडिंगमुळे विक्रम उलटला असावा किंवा आडवा पडला असावा, पण त्याचे ओळखू न येण्याइतपत नुकसान झाले नसावे, असा अंदाज शास्रज्ञांनी बांधला आहे.  छायाचित्रांचा अभ्यास करणाऱ्या एका शास्रज्ञाने सांगितले की, ''आतापर्यंत मी पाहिले आहे त्या आधारावर सांगू शकतो की, लँडर विक्रमची सावली मला दिसली. विक्रम लँडर आपल्या पायांच्या दिशेन पडला नसावा असे मी निश्चितपणे सांगू शकतो. विक्रमच्या चार पायांचे नुकसान झाले आहेत. हे पाय वाकले असावेत किंवा त्यांचे नुकसान झाले असावे.'' तर विक्रमला आलेल्या अपयशाच्या अभ्यास करणाऱ्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, ''विक्रम चंद्राच्या पृष्टभागापासून दहा किमी अंतरावर असताना अनियंत्रित झाला होता. तसेच चंद्रापासून 330 मीटरवर असताना त्याचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता.''   दरम्यान, विक्रमच्या लँडिंग प्रोग्रॅममध्ये काहीतरी गडबड होती, असे आतापर्यंतच्या तपासानंतर वाटत आहे, असे दोन शास्रज्ञांनी सांगितले. विक्रमच लँडिंग प्रोग्रॅम यू.आर. राव. सॅटेलाइट सेंटर, बंगळुरू येथे लिहिण्यात आला होता. दरम्यान, ''लँडिंग प्रोग्रॅमचे योग्य पद्धतीने परीक्षण केले गेले होते की नाही, याची माहिती घेतली पाहिजे, असे एका शास्रज्ञाने सांगितले. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमचा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्टभागावर पोहोचण्यापूर्वी 15 मिनिटांपूर्वीपर्यंतचे अंतर आणि उंचीच्या आधारावर कंट्रोल निश्चित करण्याचा होता.'' असे एका शास्रज्ञाने सांगितले. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोIndiaभारत