शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जगनमोहनच्या ‘वादळात’ चंद्राबाबूंची नौका बुडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 04:00 IST

आंध्रप्रदेशातील १३ जिल्ह्यात हजारो किलोमीटर पदयात्रा करीत लोकांमध्ये स्थान निर्माण केलेल्या जगनमोहन रेड्डी यांनी लोकसभेबरोबरच विधानसभेत आपले वर्चस्व निर्माण केले.

- समीर इनामदार अमरावती : आंध्रप्रदेशातील १३ जिल्ह्यात हजारो किलोमीटर पदयात्रा करीत लोकांमध्ये स्थान निर्माण केलेल्या जगनमोहन रेड्डी यांनी लोकसभेबरोबरच विधानसभेत आपले वर्चस्व निर्माण केले. वडील आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्यानंतर मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. वायएसआर काँग्रेसने निर्माण केलेल्या वादळात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची नौका बुडाली.युवाजन श्रमिक रयतू काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २३ जागांवर विजय मिळविला तर विधानसभेच्या १७५ जागांपैकी १५१ जागा जिंकल्या. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला २३ तर जनसेना पक्षाला केवळ एक जागा मिळू शकली. लोकसभेच्या २५ जागांपैकी तेलुगू देसम पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या.२०१३ ते २०१७ पर्यंत तेलुगू देसम पक्ष आणि एनडीए यांची युती होती. चंद्राबाबू नायडू गेल्या अनेक वर्षांपासून आंध्रसाठी विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून मागणी करीत होते. केंद्राने ही मागणी फेटाळल्यानंतर नायडू यांनी एनडीएपासून फारकत घेतली. केंद्रातील मंत्र्यांनी राजीनामे दिले; मात्र निवडणुकीत याचा तेलुगू देसमला फटका बसला.जगनमोहन यांच्या प्रचारात प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका होती. त्याशिवाय अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षामुळे तेलुगू देसम पक्षाला नुकसान सहन करावे लागले. वायएसआर काँग्रेसने आदिवासी, मागासवर्गीय, मुस्लीम यांची मोट बांधली. त्याचा फायदा जगनमोहन यांना मिळाला. कापू समाज जगनमोहन यांच्यासमवेत राहिला. रायलसीमाच्या ५२ पैकी ५० जागांवर तेलुगू देसमला पराभव पत्करावा लागला. वायएसआर काँग्रेसने ४९.९ टक्के मते मिळविली. तेलुगू देसम पक्षाला ३९.२ टक्के मते मिळाली.या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला खातेही उघडता आले नाही. मुख्य लढाई तेलुगू देसम पार्टी आणि वायएसआर काँग्रेस यांच्यातच झाली. विशेष म्हणजे काँग्रेस आणि भाजपला नोटापेक्षाही कमी मते मिळाली.जगनमोहन यांच्यासमोर आता नव्याने स्थापन झालेल्या आंध्रप्रदेश राज्याच्या प्रगतीचे मोठे आव्हान समोर आहे. सध्या आंध्रप्रदेशसमोर २.५८ लाख कोटींचे कर्ज आहे. त्याशिवाय आंध्रला विशेष दर्जा देण्यासाठीही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradesh Assembly Election 2019आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक 2019Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019