शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

सिद्धूची पाकिस्तानसाठी 'बॅटिंग'; म्हणे, काही लोकांच्या कृत्यासाठी देशाला ठरवू नका दोषी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 17:38 IST

पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतामातेच्या 38 शहीद पुत्रांना वीरमरण आलं.

चंदीगड- पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतामातेच्या 38 शहीद पुत्रांना वीरमरण आलं. पुलवाम्यातील या आत्मघातकी हल्ल्यानंतर पंजाब आणि काँग्रेसमधलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी परस्पर विरोधी विधानं केली आहेत. सिद्धू म्हणाले, दोन्ही देशांमध्ये शांती प्रस्थापित होणं गरजेचं आहे. काही लोकांच्या कृत्यासाठी एखाद्या देशाला दोषी ठरवू शकत नाही. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पाकिस्तानबरोबर चर्चा नव्हे, तर कारवाई करण्याची गरज आहे, असं मत अमरिंदर यांनी व्यक्त केली आहे.पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विधानांत मतभिन्नता आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. करतारपूर का बंद करण्यात आलं. करतारपूरशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती भाविक म्हणून येते तेव्हा ती वेगळी असते. तसेच या समस्यांचं मुळापर्यंत जाऊन त्या संपवल्या पाहिजेत, असं मला वाटत असल्याचं सिद्धूनं सांगितलं आहे.सीआरपीएफच्या वाहनावरील हल्ल्यात 38 जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर तरी भारताने पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. सर्व राजकीय नेत्यांनीही या भेकड हल्ल्याचा निषेध केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे भारतही काही जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संपूर्ण भारत जवानांच्या मागे ठामपणे उभा आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, राज्यपाल सत्यपाल मलिक तसेच माजी संरक्षणमंत्री शरद पवार व मुलायम सिंह यादव, योगी आदित्यनाथ यांनीही हल्ल्याचा धिक्कार केला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राइक केला. पण त्यातून पाकला धडा मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता कायमस्वरूपी अद्दल घडविण्याची वेळ आली आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली एक घाव घालून पाकचे जे दोन तुकडे केले होते, तशीच कारवाई भारताने करायला हवी, अशीच चर्चा सुरू आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू