शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 11:32 IST

कारमधून प्रवास करणारे पाच तरुण थोडक्यात बचावले आहेत. बऱ्याच प्रयत्नांनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी कालव्यात बुडालेल्या कारमधून तरुणांना बाहेर काढलं.

उत्तर प्रदेशातील चंदौली येथे एक कार कालव्यात पडली. या अपघातातकारमधून प्रवास करणारे पाच तरुण थोडक्यात बचावले आहेत. बऱ्याच प्रयत्नांनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी कालव्यात बुडालेल्या कारमधून तरुणांना बाहेर काढलं. मात्र चौकशीनंतर आता याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कार जप्त केली असून पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची जेलमध्ये रवानगी केली आहे.

स्टंटबाजीमुळे कार कालव्यात पडल्याचं तपासात समोर आलं आहे. तरुण पिकनिकला गेले होते आणि बेदरकारपणे गाडी चालवत होते, त्यामुळे हा अपघात झाला. हे पाचही तरुण दीनदयाळ नगर येथील सिकथिया भागातील रहिवासी आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

२५ सप्टेंबर रोजी चंदौलीच्या चकिया कोतवाली परिसरात एक अनियंत्रित कार कालव्यात पडली होती. या कारमध्ये मुगलसराय कोतवाली परिसरात राहणारे पाच तरुण होते, ते पिकनिकला गेले होते. कालव्यात पडलेली कार पाण्यात तरंगत होती, त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला.

अपघाताच्या वेळी तेथे उपस्थित ग्रामस्थ आणि पोलिसांमुळे तरुणांचा जीव वाचला आहे. यानंतर पोलिसांनी कालव्यात पडलेल्या कारला बाहेर काढलं. मात्र आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान स्टंटबाजीमुळे हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

गाडीतील तरुण स्टंटबाजी करत सुसाट वेगाने गाडी चालवत वळण घेत होते. त्यामुळे हा अपघात झाला. तपासात असं तथ्य समोर आल्यानंतर पोलिसांनी कारमधील या पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दंड ठोठावला. तसेच कार जप्त करण्यात आली. 

टॅग्स :carकारAccidentअपघात