शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

शिक्षणाच्या जागतिक स्पर्धेत स्थान निर्माण करण्याचे आव्हान

By admin | Updated: June 16, 2014 04:00 IST

शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर भारत कोठेच नाही. जगातील टॉप २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे

पुणे : शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर भारत कोठेच नाही. जगातील टॉप २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या जागतिक स्पर्धेत स्थान निर्माण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे आणि ते आयसरसारख्या संस्था पेलतील, याचा मला विश्वास आहे, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या (आयसर) पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बोर्ड आॅफ गव्हर्नरचे अध्यक्ष टी.व्ही. रामकृष्णन, आयसरचे संचालक के.एन. गणेश, कुलसचिव जी. राजशेखर व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते आकाश गुरू या विद्यार्थ्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.राष्ट्रपती म्हणाले, मानवाच्या जीवनात विज्ञान महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे ज्ञानावर आधारित समाज निर्माण होत आहे. यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनावर भर देणारी शिक्षणपद्धती विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. हे ध्येय बाळगून आयसर ‘सायन्स आऊटरिच प्रोग्राम’ राबवत आहे, ज्याच्या माध्यमातून संस्थेबाहेर शाळांमध्ये, वस्त्यांमध्ये आयसरचे विद्यार्थी मूलभूत विज्ञान पोहोचवत आहेत. भारताला शिक्षण आणि संशोधनाची प्राचीन परंपरा आहे. तक्षशिला, नालंदा ही विद्यापीठे जागतिक स्तरावर प्रसिद्ध होती. त्यामुळे उच्च शिक्षणात भारत दीड हजार वर्षे अव्वल होते. पण ही परंपरा खंडित झाली. पुन्हा हा गौरव प्राप्त करण्यासाठी विज्ञानाच्या मूलभूत शाखांचा विकास व्हायला हवा, असे मत मुखर्जी यांनी व्यक्त केले.इराणी म्हणाल्या, आपली अर्थव्यवस्था सेवा उद्योगावर आधारित आहे. ती ज्ञानावर आधारित करायची असल्यास उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची गरज आहे. याचबरोबर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यावरही लक्ष देण्याची आवश्यकता असून, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, आपल्याकडील नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित आहे. त्यावर भविष्यात आपला विकास होणार नाही. त्यामुळे गुणवत्ता, कुशल मनुष्यबळ आणि नवकल्पनांच्या जोरावरच आपण विकास साधू शकतो. त्यासाठी आयसरसारख्या संस्थांची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)