शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बॉलिवूडमधील एका गटाला पंतप्रधानपदी मोदी नकोसे - मधुर भांडारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 17:12 IST

त्याला विरोध करण्यासाठी अनुपम खेर यांच्या नेतृत्त्वाखाली दुसरा गट निर्माण झाला.

नवी दिल्ली: पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींची झालेली निवड ही बॉलीवूडमधील एका गटाला रुचलेली नसल्याचा गौप्यस्फोट प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी केला. छत्तीसढच्या भिलाई येथील कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी म्हटले की, बॉलिवूडमधील अनेकांच्या मनात मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्याची सल अजूनही आले. या गटात अभिनेते, दिग्दर्शक आणि अनेक निर्मात्यांचा समावेश आहे. त्यामुळेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी बॉलिवूडमध्ये दोन तट पडले होते. बॉलिवूडमधील जवळपास 40 ते 50 जण नरेंद्र मोदींविरोधात एकटवले होते. मोदी पंतप्रधान होऊ नयेत, यासाठी त्यांनी प्रयत्नही केल्याचे मधुर भांडारकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी या लोकांकडून मोदींविरोधात पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु होते. तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी अनुपम खेर यांच्या नेतृत्त्वाखाली दुसरा गट निर्माण झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज मोठ्याप्रमाणावर राजकारण करतात. याच लोकांकडून 'इंदू सरकार' चित्रपटाच्यावेळी माझ्यावर आरोप करण्यात आले होते. इंदू सरकारच्या निर्मितीसाठी केवळ सहा कोटी रूपये खर्च आला. अशावेळी भाजपाने या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत पुरविली होती, हा आरोप खूपच हास्यास्पद आहे. भविष्यात मला एखाद्या बिग बजेट चित्रपटासाठी मदत लागलीच तर मी नक्कीच भाजपाकडे जाईन, असा टोलाही यावेळी मधुर भांडारकर यांनी विरोधकांना लगावला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhur Bhandarkarमधुर भांडारकर bollywoodबॉलिवूड