शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 20:20 IST

याच बरोबर ममता बॅनर्जी यांनी, काही लोक जाणून-बुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करत सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या बनावट व्हिडिओंमुळे समाजात सांप्रदायिक तणाव वाढेल. हे योग्य नाही. यामुळे देशातील वातावरण खराब होईल.

बांगलादेशातहिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांसोबतच अनेक नेत्यांनाही तेथील हिंदूंच्या सुरक्षितते प्रति चिंता व्यक्त केली आहे. यातच आता, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (11 डिसेंबर) केंद्र सरकारकडे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे. याच बरोबर बांगलादेशातून ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांना आणावे, असेही ममता यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री ममता जगन्नाथ मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी दीघाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्या म्हणाल्या, "केंद्राने हिंसाग्रस्त बांगलादेशात अल्पसंख्यकांना सुरक्षितता द्यायला हवी. तसेच, ज्यांची परत येण्याची इच्छा असेल, त्यांना परत आणायला हवे. आम्हाला बांगलादेशातील अल्पसंख्याकांची सुरक्षा हवी आहे, यासंदर्भात केंद्राने कारवाई करावी."

"काही लोक जाणून-बुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करत आहेत" -याच बरोबर ममता बॅनर्जी यांनी, काही लोक जाणून-बुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करत सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या बनावट व्हिडिओंमुळे समाजात सांप्रदायिक तणाव वाढेल. हे योग्य नाही. यामुळे देशातील वातावरण खराब होईल.

हिंदूंवर होतायत हल्ले -  बांगलादेशच्या 17 कोटी लोकसंखेत 8 टक्के अल्पसंख्याक हिंदू आहेत. या हिंदूंना 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारच्या पतनानंतर 50 हून अधिक जिल्ह्यांमध्ये हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. हिंदू धर्माला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत. आतापर्यंत अनेक मंदिरांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय, इस्कॉन मंदिराचीही तोडफोड करण्यात आली आहे. तसेच, मंदिरातील मूर्तींचीही मोडतोड करण्यात आली आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशMamata Banerjeeममता बॅनर्जीHinduहिंदूCentral Governmentकेंद्र सरकार