शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

CoronaVirus: 14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार; १५ पासून देशात काय काय बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 10:37 IST

CoronaVirus: पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ तारखेला संपणार

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपेल. त्यामुळे १५ एप्रिलपासून नेमकं काय होणार, लॉकडाऊनमुळे लादण्यात आलेले निर्बंध हटवले जाणार का, लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार की टप्प्याटप्प्यानं निर्बंध मागे घेतले जाणार, असे अनेक प्रश्न सध्या देशवासीयांना पडले आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपत आल्यानं केंद्र आणि राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून काय करायचं, याची तयारी सुरू केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन हटवला गेल्यास काही निर्बंध लागू असतील. म्हणजेच लॉकडाऊन काही अंशीच हटवण्यात येईल आणि नागरिकांना काही नियमांचं पालन करावं लागेल. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका मंत्रिगटाच्या बैठकीत काल याबद्दल चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. वाहनांसाठी सम-विषम फॉर्म्युला, सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये प्रवाशांची मर्यादित संख्या असे मुद्दे बैठकीत चर्चिले गेले. १५ मेपर्यंत मॉल आणि शाळा बंद ठेवण्याची शिफारसदेखील मंत्रिगटानं केली. धार्मिक स्थळंदेखील काही दिवस बंद ठेवण्यावरही चर्चा झाली.१४ एप्रिलनंतर काही भागातल्या नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी मिळू शकते. मात्र काही नियम-अटी लागू असतील. रस्त्यांवरील वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो. दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरण्यात आला होता. याशिवाय कारमधून एकावेळी किती जण प्रवास करू शकतात, याची मर्यादादेखील निश्चित केली जाऊ शकते.लॉकडाऊननंतर राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या. १४ एप्रिलनंतरदेखील आंतरराज्यीय सीमा बंदच राहण्याची शक्यता अधिक आहे. ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सुरू होण्याची शक्यतादेखील कमी आहे. सध्या केमिस्टसह किराणा मालाची दुकानं सुरू आहेत. १५ एप्रिलपासून आणखी काही दुकानं उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र यासंदर्भातील नियम कोरोना हॉटस्पॉट आणि इतर भागांसाठी वेगवेगळे असतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या