शहरं
Join us  
Trending Stories
1
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
4
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
5
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
6
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
8
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
9
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
10
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
11
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
12
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
13
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
14
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
15
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
16
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
17
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
18
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
19
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
20
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यात 4 दिवसच करा काम; तीन दिवस सुट्ट्यांचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 03:28 IST

कायद्याच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायद्यांची लवकर अंमलबजावणी होणार आहे. ते लागू झाल्यास नोकरदारांना ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टीचा पर्याय मिळणार आहे. या कायद्याच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू आहे. परंतु यासाठी कामगारांच्या कामाचे दिवसाला १२ तास असतील. त्यासाठी कंपनी आणि कर्मचारी दोघांचीही सहमती आवश्यक असेल. केंद्रीय कामगार मंत्रालय नव्या मसुद्यावर काम करत आहे. केंद्रीय कामगार सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितले, की कामाची बदलणारी पद्धत पाहून कामांच्या वेळांमध्ये काही सुधारणा करण्याचे प्रयत्न आहेत. काही सवलती देण्याचा प्रयत्न आहे. कंपनी-कामगारांची सहमती हवीनव्या कायद्यांनुसार कंपन्यांना कामाच्या दिवसांबाबत लवचिकता मिळेल. आठवड्यात एकूण ४८ तास काम करावे लागते. त्यानुसार दररोज १२ तास काम केल्यास आठवड्यात ४ दिवस कामाचे असून शकतात. मात्र, त्यासाठी कंपनी आणि कामगार यांच्यात सहमती हवी. नवा नियम कोणावर लादता येणार नाही.असंघटित क्षेत्रासाठी स्वतंत्र संकेतस्थळश्रम मंत्रालयातर्फे स्वतंत्र इंटरनेट संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. असंघटित क्षेत्रासाठी हे संकेतस्थळ असून यावर्षी जून महिन्यापर्यंत कामगार त्यावर नोंदणी करु शकतील. नोंदणी करणऱ्यांना विविध सुविधांचा लाभ मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या संकेतस्थळाचा उल्लेख केला हाेता.सक्ती करता येणार नाहीनव्या कायद्यानुसार ४ दिवस काम करून ३ दिवसांची सुट्टी घेता येईल. असे करणे सक्तीचे नसेल. या पर्यायावर कंपनी आणि कर्मचारी निर्णय घेऊ शकतात. बहुतांश राज्यांनी त्यांची नियमावली तयार केली आहे. अंतिम मसुदा लवकरच तयार होईल, असे चंद्रा म्हणाले. याबाबतच्या शंका चर्चेतून साडविण्यात आल्या आहेत, असे अपूर्व चंद्र यांनी सांगितले.१ एप्रिलपासून नवे कायदेनवे कायदे १ एप्रिलपासून लागू करण्याची सरकारची याेजना आहे. त्यात वेतन कायदा, औद्याेगिक निगडित कायदा, सुरक्षा, आराेग्य व सामाजिक सुरक्षा कायद्यांचा समावेश आहे. नव्या कायद्यांमध्ये कामगार राज्य विमा महामंडळातर्फे कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचीही तरतूद केली आहे. कंपन्यांवर त्याचा भार पडणार नाही. सर्व घटकांचा विचार करुनच अंतिम वर्कर्स काेड लागू करण्यात येतील, असे चंद्र यांनी सांगितले.