शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधाराला अटक; ५ महिन्यांनंतर सुरक्षा दलांना मोठं यश, ऑपरेशन महादेव यशस्वी!
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
4
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
5
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
6
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
7
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
8
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
9
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
10
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
11
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
12
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
13
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
14
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
15
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
16
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
18
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
19
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
20
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे केंद्रावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 04:28 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पत्रावरून संतप्त : शेतकऱ्यांची बदनामी नको

चंडीगढ : पंजाबमधून नुकत्याच मुक्त केलेल्या ५८ मजुरांच्या स्थितीबाबत केंद्र सरकारने राज्याला लिहिलेल्या पत्रात शेतकऱ्यांबद्दल दुष्प्रचार केल्यावरून मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.त्यांनी म्हटले आहे की, कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलनाला वेगळी दिशा देण्यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा हा एक कट आहे. या शेतकऱ्यांना केंद्र सरकार व भाजप सातत्याने अतिरेकी, शहरी नक्षली व गुंडे म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.अमरिंदर सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांवर मजुरांसंबंधीचा आरोप करणे अयोग्य आहे. याबाबत केंद्राचा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा आहे.या संपूर्ण घटनाक्रमाचे विश्लेषण केले असता एक बाब प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे भारत-पाक सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाने पकडलेल्या संशयित व्यक्तींच्या अटकेबाबतची संवेदनशील माहिती शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी निराधार तथ्यांच्या आधारे समोर आणली जात आहे. याबाबत राज्य सरकारकडून उपयुक्त उत्तर येण्याची वाट न पाहता, गृहमंत्रालयाने काही प्रमुख माध्यमांना निवडक पद्धतीने दिली.माझे सरकार व पोलीस गरिबांच्या, वंचितांच्या मानवाधिकारांच्या रक्षणासाठी सक्षम आहे. प्रत्येक प्रकरणावर योग्य ती कारवाई सुरू आहे. बहुतांश लोक त्यांच्या कुटुंबांसमवेत राहत आहेत. या प्रकरणात कोणत्याही टप्प्यावर काहीही तथ्य गुन्हेगारांच्या विरोधात समोर आले तर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.केंद्राच्या पत्रात नेमके काय म्हटले?पंजाब राज्याच्या मुख्य सचिवांना १७ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ५८ जणांना चांगले वेतन देण्याचा वायदा करून पंजाब राज्यामध्ये आणण्यात आले होते. परंतु त्यांचे शोषण करण्यात आले. त्यांना पंजाब राज्यात आल्यावर अमलीपदार्थ देण्यात आले व अमानवीय दशेमध्ये काम करण्यास बाध्य करण्यात आले. या पत्रावरून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात संघर्ष उडाला आहे.या शेतकऱ्यांना केंद्र सरकार व भाजप सातत्याने अतिरेकी, शहरी नक्षली व गुंडे म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.