शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

प्रायव्हसीचा आदर, पण गंभीर प्रकरणांची माहिती द्यायलाच हवी; केंद्राने Whatsapp ला बजावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 20:41 IST

Whatsapp: प्रायव्हसीचा आदर आहे. परंतु, गंभीर प्रकरणासंदर्भातील माहिती देणे बंधनकारक आहे, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देभारत सरकार राईट टू प्रायव्हसीचा आदर करते पण गंभीर प्रकरणांची माहिती द्यायलाच हवीकेंद्राने Whatsapp ला बजावले

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप आणि अन्य समाजमाध्यमांमध्ये मार्गदर्शक नियमावलीवरून वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारची नियमावली मान्य करण्यास व्हॉट्सअॅपने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यातच आता यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर भूमिका मांडताना प्रायव्हसीचा आदर आहे. परंतु, गंभीर प्रकरणासंदर्भातील माहिती देणे बंधनकारक आहे, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. (centre govt give statement on whatsapp message trace issue social media guidelines)

व्हॉट्सअ‍ॅपच्या भूमिकेवर स्पष्टीकरण करणारे परिपत्रक केंद्र सरकारकडून जारी करण्यात आले आहे. राईट टू प्रायव्हसीच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅपकडून केंद्र सरकारची मार्गदर्शक नियमावली नाकारणे ही दिशाभूल आहे, असे सांगत केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर यांनी व्हॉट्सअॅपच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. 

देशात आतापर्यंत किती टक्के लसी वाया गेल्या? ‘या’ राज्याने वाया घालवले सर्वाधिक डोस

भारत सरकार राईट टू प्रायव्हसीचा आदर करते

भारत सरकार व्हॉट्सअॅपच्या राईट टू प्रायव्हसीचा आदर करते. मात्र, अशा प्रकारे संदेशाच्या मूळ जनकाची माहिती फक्त कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर किंवा अश्लीलता पसरवणाऱ्या संदेशांच्या बाबतीतच मागितली जाईल. व्हॉट्सअॅपच्या राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन करण्याचा कोणताही हेतू केंद्र सरकारचा नाही, असे रविशंकर यांनी म्हटले आहे.  

‘कोरोनिल’ला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, आम्ही प्रमाण देऊ: आचार्य बालकृष्ण

व्हॉट्सअॅपच्या धोरणावर केंद्राची नाराजी

एकीकडे व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार फेसबुकसोबत माहिती शेअर करण्याची परवानगी युजर्सकडून मागते. मात्र, दुसरीकडे फेक न्यूज टाळणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीचा विरोध करते, असे सांगत केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार सोशल मीडियावर पोस्ट वा शेअर करण्यात आलेला कोणताही मेसेज सगळ्यात पहिल्यांदा कुणी पोस्ट केला, त्या व्यक्तीची माहिती केंद्र सरकारने मागितल्यास ती पुरवावी लागणार आहे. ज्या पोस्ट्स कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करतील किंवा अश्लीलता पसरवण्यासाठी कारणीभूत ठरलीत, अशा पोस्टचे मूळ शोधण्यासाठी हा नियम समाविष्ट केला आहे. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपने यावर आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCentral Governmentकेंद्र सरकारRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय