शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

या भाष्यकाराची उणीव नेहमीच जाणवेल; गिरीश कर्नाड यांना गडकरींची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 23:09 IST

प्रदीर्घ आजारानं वयाच्या 81व्या वर्षी कर्नाड यांचं निधन

मुंबई: समाज, संस्कृती, साहित्य, नाट्य अशा प्रतिभा आणि कलेच्या क्षेत्रांत निर्मोही व व्रतस्थपणे काम करणाऱ्या गिरीश कर्नाड यांची उणीव नेहमीच जाणवेल, अशा शब्दांत केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी कर्नाड यांना श्रद्धांजली वाहिली. कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजारानं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं. अभिनय आणि साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊन आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या गिरीश कर्नाड यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आदरांजली वाहिली. 'ज्येष्ठ अभिनेते, लेखक, नाटककार डॉ. गिरीश कर्नाड यांच्या निधनानं भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीतील एक भाष्यकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमीच्या क्षेत्रात मोलाचं योगदान देत असतानाच कर्नाड यांनी आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. ते प्रख्यात विचारवंत आणि प्रतिभावंत लेखक होते. त्यांची ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटातील भूमिका कायम लक्षात राहणारी आहे. ‘मेरी जंग’ या हिंदी सिनेमात त्यांची भूमिका अतिशय छोटी होती. परंतु सत्याशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहणारा आणि त्यासाठी निश्चलपणे फासावर चढणारा ‘दीपक वर्मा’ हा माणूस कर्नाड यांनी आपल्या संयत अभिनयाने अमर केला. आजारी असताना शेवटच्या काळात ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातील कर्नाड यांची भूमिकाही लक्षात राहणारी आहे. समाज, संस्कृती, साहित्य, नाट्य अशा प्रतिभा आणि कलेच्या क्षेत्रांत निर्मोही व व्रतस्थपणे काम करणाऱ्या या प्रतिभावंताची उणीव नेहमीच जाणवणार आहे', अशा शब्दांत गडकरींनी कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पित केली.  

टॅग्स :Girish Karnadगिरिश कर्नाडNitin Gadkariनितीन गडकरी