शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

या भाष्यकाराची उणीव नेहमीच जाणवेल; गिरीश कर्नाड यांना गडकरींची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 23:09 IST

प्रदीर्घ आजारानं वयाच्या 81व्या वर्षी कर्नाड यांचं निधन

मुंबई: समाज, संस्कृती, साहित्य, नाट्य अशा प्रतिभा आणि कलेच्या क्षेत्रांत निर्मोही व व्रतस्थपणे काम करणाऱ्या गिरीश कर्नाड यांची उणीव नेहमीच जाणवेल, अशा शब्दांत केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी कर्नाड यांना श्रद्धांजली वाहिली. कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजारानं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं. अभिनय आणि साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊन आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या गिरीश कर्नाड यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आदरांजली वाहिली. 'ज्येष्ठ अभिनेते, लेखक, नाटककार डॉ. गिरीश कर्नाड यांच्या निधनानं भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीतील एक भाष्यकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमीच्या क्षेत्रात मोलाचं योगदान देत असतानाच कर्नाड यांनी आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. ते प्रख्यात विचारवंत आणि प्रतिभावंत लेखक होते. त्यांची ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटातील भूमिका कायम लक्षात राहणारी आहे. ‘मेरी जंग’ या हिंदी सिनेमात त्यांची भूमिका अतिशय छोटी होती. परंतु सत्याशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहणारा आणि त्यासाठी निश्चलपणे फासावर चढणारा ‘दीपक वर्मा’ हा माणूस कर्नाड यांनी आपल्या संयत अभिनयाने अमर केला. आजारी असताना शेवटच्या काळात ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातील कर्नाड यांची भूमिकाही लक्षात राहणारी आहे. समाज, संस्कृती, साहित्य, नाट्य अशा प्रतिभा आणि कलेच्या क्षेत्रांत निर्मोही व व्रतस्थपणे काम करणाऱ्या या प्रतिभावंताची उणीव नेहमीच जाणवणार आहे', अशा शब्दांत गडकरींनी कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पित केली.  

टॅग्स :Girish Karnadगिरिश कर्नाडNitin Gadkariनितीन गडकरी