शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

लॅटरल एंट्रीला केंद्र सरकारकडून स्थगिती, PM मोदींच्या सूचनेनंतर UPSCला दिले भरती रोखण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 15:13 IST

Central Govt Suspends Lateral Entry: लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून पदांची भरती करण्याला काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.

लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून पदांची भरती करण्याला काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून यूपीएससीला पत्र लिहून या संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.  

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यूपीएसचीचे चेअरमन यांना यासंदर्भातील पत्र लिहिण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी यूपीए सरकारच्या काळात अशा नियुक्तांसाठी घेण्यात आलेल्या पुढाकाराचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रामध्ये म्हटलंय की, २००५ मध्ये वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीची शिफारस केली होती. दरम्यान, हल्लीच यूपीएससीकडून लॅटरल एंट्रीसाठीच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र ही भरती प्रक्रिया आणि त्यामधील आरक्षणावरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका करण्यात येत होती. दरम्यान, हा वाद दिवसेंदिवस चिघळत असल्याने अखेरीस केंद्र सरकारने पत्र लिहून यूपीएससीला थेट भरतीची जाहिरात रोखण्याचे आदेश दिले आहेत.  

दरम्यान, यूपीएससीमध्ये होणाऱ्या लॅटरल एंट्रीबाबत विरोधी पक्षांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका करण्यात येत होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यूपीएससीमधील लॅटरल एंट्री आणि त्यामध्ये आरक्षण न देण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. एवढंच नाही, तर सरकारमधील अनेक घटक पक्षांनीही याबाबत आवाज उठवला होता. त्यामुळे अखेरीस केंद्र सरकारने यूपीएससीला एक पत्र लिहून लेटरल एंट्रीची जाहिरात रद्द करण्याचे आदेश दिले.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारupscकेंद्रीय लोकसेवा आयोग