शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

लॅटरल एंट्रीला केंद्र सरकारकडून स्थगिती, PM मोदींच्या सूचनेनंतर UPSCला दिले भरती रोखण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 15:13 IST

Central Govt Suspends Lateral Entry: लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून पदांची भरती करण्याला काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.

लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून पदांची भरती करण्याला काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून यूपीएससीला पत्र लिहून या संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.  

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यूपीएसचीचे चेअरमन यांना यासंदर्भातील पत्र लिहिण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी यूपीए सरकारच्या काळात अशा नियुक्तांसाठी घेण्यात आलेल्या पुढाकाराचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रामध्ये म्हटलंय की, २००५ मध्ये वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीची शिफारस केली होती. दरम्यान, हल्लीच यूपीएससीकडून लॅटरल एंट्रीसाठीच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र ही भरती प्रक्रिया आणि त्यामधील आरक्षणावरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका करण्यात येत होती. दरम्यान, हा वाद दिवसेंदिवस चिघळत असल्याने अखेरीस केंद्र सरकारने पत्र लिहून यूपीएससीला थेट भरतीची जाहिरात रोखण्याचे आदेश दिले आहेत.  

दरम्यान, यूपीएससीमध्ये होणाऱ्या लॅटरल एंट्रीबाबत विरोधी पक्षांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका करण्यात येत होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यूपीएससीमधील लॅटरल एंट्री आणि त्यामध्ये आरक्षण न देण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. एवढंच नाही, तर सरकारमधील अनेक घटक पक्षांनीही याबाबत आवाज उठवला होता. त्यामुळे अखेरीस केंद्र सरकारने यूपीएससीला एक पत्र लिहून लेटरल एंट्रीची जाहिरात रद्द करण्याचे आदेश दिले.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारupscकेंद्रीय लोकसेवा आयोग