शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

लॅटरल एंट्रीला केंद्र सरकारकडून स्थगिती, PM मोदींच्या सूचनेनंतर UPSCला दिले भरती रोखण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 15:13 IST

Central Govt Suspends Lateral Entry: लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून पदांची भरती करण्याला काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.

लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून पदांची भरती करण्याला काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून यूपीएससीला पत्र लिहून या संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.  

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यूपीएसचीचे चेअरमन यांना यासंदर्भातील पत्र लिहिण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी यूपीए सरकारच्या काळात अशा नियुक्तांसाठी घेण्यात आलेल्या पुढाकाराचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रामध्ये म्हटलंय की, २००५ मध्ये वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीची शिफारस केली होती. दरम्यान, हल्लीच यूपीएससीकडून लॅटरल एंट्रीसाठीच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र ही भरती प्रक्रिया आणि त्यामधील आरक्षणावरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका करण्यात येत होती. दरम्यान, हा वाद दिवसेंदिवस चिघळत असल्याने अखेरीस केंद्र सरकारने पत्र लिहून यूपीएससीला थेट भरतीची जाहिरात रोखण्याचे आदेश दिले आहेत.  

दरम्यान, यूपीएससीमध्ये होणाऱ्या लॅटरल एंट्रीबाबत विरोधी पक्षांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका करण्यात येत होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यूपीएससीमधील लॅटरल एंट्री आणि त्यामध्ये आरक्षण न देण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. एवढंच नाही, तर सरकारमधील अनेक घटक पक्षांनीही याबाबत आवाज उठवला होता. त्यामुळे अखेरीस केंद्र सरकारने यूपीएससीला एक पत्र लिहून लेटरल एंट्रीची जाहिरात रद्द करण्याचे आदेश दिले.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारupscकेंद्रीय लोकसेवा आयोग