शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

घरगुती गॅस सिलेंडरच्या सब्सिडीबाबत केंद्र सरकारचा नवीन प्लॅन; वाचा कुणाच्या खात्यात येणार पैसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 18:36 IST

सुरुवातीला सरकार विना सब्सिडी सिलेंडरचा पुरवठा करेल किंवा दुसरं काही निवडक ग्राहकांना सब्सिडीचा लाभ दिला जाईल.

ठळक मुद्दे मागीस काही महिन्यांपासून गॅस सिलेंडर सब्सिडी बंद आहे. मार्च २०२० पासून सब्सिडी न देण्याचं सुरु झालं आहे.सरकारने सर्वच भागात सब्सिडी बंद केली नाही. आजही दुर्गम भागात सब्सिडी दिली जात आहे.आर्थिक वर्ष २०२१ मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ३ हजार ५५९ कोटी दिले गेलेत

नवी दिल्ली – येत्या काही दिवसांत घरगुती सिलेंडरचे दर १ हजार रुपयांपर्यंत पोहचतील. LPG गॅसच्या किंमती वाढल्यावर सरकार काय करणार? सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार ग्राहक आता सिलेंडरसाठी १ हजार मोजायला तयार आहेत. त्यामुळे वाढत्या किंमतीवर सब्सिडी देण्याचा विचार काय आहे याबाबत अद्याप स्पष्ट नाही. परंतु एलपीजी सिलेंडरबाबत सरकार नवा प्लॅन आणण्याचा विचार करत आहे.

वाढत्या गॅस सिलेंडर किंमतीवर सराकर दोनपैकी एक पर्याय स्वीकारु शकतं. सुरुवातीला सरकार विना सब्सिडी सिलेंडरचा पुरवठा करेल किंवा दुसरं काही निवडक ग्राहकांना सब्सिडीचा लाभ दिला जाईल. सब्सिडी किती द्यायची याची कुठलीही स्पष्टता नाही. परंतु १० लाख रुपये इन्कमपर्यंत हे लागू होऊ शकतं. आणि काही निवडक उज्ज्वला लाभार्थ्यांना सब्सिडीचा लाभ दिला जाऊ शकतो. इतरांसाठी सब्सिडी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मागीस काही महिन्यांपासून गॅस सिलेंडर सब्सिडी बंद आहे. मार्च २०२० पासून सब्सिडी न देण्याचं सुरु झालं आहे. कोविड महामारीमुळे कच्चे तेल आणि गॅसच्या किंमती कमी झाल्यानंतर हा निर्णय घेतला होता. परंतु सरकारने सर्वच भागात सब्सिडी बंद केली नाही. आजही दुर्गम भागात सब्सिडी दिली जात आहे. देशातील १५ राज्यातील काही ठराविक जिल्ह्यात सब्सिडी दिली जात आहे. परंतु ही संख्या आता ८ राज्यांपुरती करण्यात आली आहे.

सब्सिडीवर सरकारचा किती पैसा खर्च होतो?

सब्सिडीवर सरकारच्या खर्चाचा विचार केला तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ३ हजार ५५९ कोटी दिले गेलेत. आर्थिक वर्ष २०२० मध्ये हा खर्च २४ हजार ४६८ कोटी इतका होता. डीबीटी स्कीम जानेवारी २०१५ पासून ग्राहकांना मिळत होती. एलपीजी सिलेंडरचे सगळे पैसे ग्राहकांना भरावे लागत त्यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यात डायरेक्ट रिफंड पैसे मिळत होते. १ सप्टेंबर रोजी सरकारने एलपीजी सिलेंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ केली. या दरानंतर दिल्लीत ८८४ .५० रुपये मुंबईत ८८४.५० आणि चेन्नईमध्ये ९००.५० रुपये गॅस सिलेंडर ग्राहकांना घ्यावे लागत आहेत.

केरोसिनपासून लोकं जेवण बनवणार?

काही माध्यमात अशा बातम्या आल्यात की, एलपीजी सब्सिडी बंद करण्याचा वाईट परिणाम गरीब वर्गातील लोकांवर होत आहे. ग्रामीण भागात अनेक घरात एलपीजी सिलेंडरचा वापर बंद केला आहे. केरोसिन अथवा लाकूड जाळून जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे. कारण ८०० रुपये दराने सिलेंडर विकत घेणे यांना परवडत नाही. जर एलपीजी सिलेंडरचे दर यापुढे असेच वाढले तर त्यात आणखी अडचणीचा सामना लोकांना करावा लागू शकतो.    

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरCentral Governmentकेंद्र सरकार