शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

घरगुती गॅस सिलेंडरच्या सब्सिडीबाबत केंद्र सरकारचा नवीन प्लॅन; वाचा कुणाच्या खात्यात येणार पैसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 18:36 IST

सुरुवातीला सरकार विना सब्सिडी सिलेंडरचा पुरवठा करेल किंवा दुसरं काही निवडक ग्राहकांना सब्सिडीचा लाभ दिला जाईल.

ठळक मुद्दे मागीस काही महिन्यांपासून गॅस सिलेंडर सब्सिडी बंद आहे. मार्च २०२० पासून सब्सिडी न देण्याचं सुरु झालं आहे.सरकारने सर्वच भागात सब्सिडी बंद केली नाही. आजही दुर्गम भागात सब्सिडी दिली जात आहे.आर्थिक वर्ष २०२१ मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ३ हजार ५५९ कोटी दिले गेलेत

नवी दिल्ली – येत्या काही दिवसांत घरगुती सिलेंडरचे दर १ हजार रुपयांपर्यंत पोहचतील. LPG गॅसच्या किंमती वाढल्यावर सरकार काय करणार? सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार ग्राहक आता सिलेंडरसाठी १ हजार मोजायला तयार आहेत. त्यामुळे वाढत्या किंमतीवर सब्सिडी देण्याचा विचार काय आहे याबाबत अद्याप स्पष्ट नाही. परंतु एलपीजी सिलेंडरबाबत सरकार नवा प्लॅन आणण्याचा विचार करत आहे.

वाढत्या गॅस सिलेंडर किंमतीवर सराकर दोनपैकी एक पर्याय स्वीकारु शकतं. सुरुवातीला सरकार विना सब्सिडी सिलेंडरचा पुरवठा करेल किंवा दुसरं काही निवडक ग्राहकांना सब्सिडीचा लाभ दिला जाईल. सब्सिडी किती द्यायची याची कुठलीही स्पष्टता नाही. परंतु १० लाख रुपये इन्कमपर्यंत हे लागू होऊ शकतं. आणि काही निवडक उज्ज्वला लाभार्थ्यांना सब्सिडीचा लाभ दिला जाऊ शकतो. इतरांसाठी सब्सिडी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मागीस काही महिन्यांपासून गॅस सिलेंडर सब्सिडी बंद आहे. मार्च २०२० पासून सब्सिडी न देण्याचं सुरु झालं आहे. कोविड महामारीमुळे कच्चे तेल आणि गॅसच्या किंमती कमी झाल्यानंतर हा निर्णय घेतला होता. परंतु सरकारने सर्वच भागात सब्सिडी बंद केली नाही. आजही दुर्गम भागात सब्सिडी दिली जात आहे. देशातील १५ राज्यातील काही ठराविक जिल्ह्यात सब्सिडी दिली जात आहे. परंतु ही संख्या आता ८ राज्यांपुरती करण्यात आली आहे.

सब्सिडीवर सरकारचा किती पैसा खर्च होतो?

सब्सिडीवर सरकारच्या खर्चाचा विचार केला तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ३ हजार ५५९ कोटी दिले गेलेत. आर्थिक वर्ष २०२० मध्ये हा खर्च २४ हजार ४६८ कोटी इतका होता. डीबीटी स्कीम जानेवारी २०१५ पासून ग्राहकांना मिळत होती. एलपीजी सिलेंडरचे सगळे पैसे ग्राहकांना भरावे लागत त्यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यात डायरेक्ट रिफंड पैसे मिळत होते. १ सप्टेंबर रोजी सरकारने एलपीजी सिलेंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ केली. या दरानंतर दिल्लीत ८८४ .५० रुपये मुंबईत ८८४.५० आणि चेन्नईमध्ये ९००.५० रुपये गॅस सिलेंडर ग्राहकांना घ्यावे लागत आहेत.

केरोसिनपासून लोकं जेवण बनवणार?

काही माध्यमात अशा बातम्या आल्यात की, एलपीजी सब्सिडी बंद करण्याचा वाईट परिणाम गरीब वर्गातील लोकांवर होत आहे. ग्रामीण भागात अनेक घरात एलपीजी सिलेंडरचा वापर बंद केला आहे. केरोसिन अथवा लाकूड जाळून जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे. कारण ८०० रुपये दराने सिलेंडर विकत घेणे यांना परवडत नाही. जर एलपीजी सिलेंडरचे दर यापुढे असेच वाढले तर त्यात आणखी अडचणीचा सामना लोकांना करावा लागू शकतो.    

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरCentral Governmentकेंद्र सरकार