शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

केंद्र सरकार मांडणार पूर्ण अर्थसंकल्प!; निवडणूक वर्ष असनाताही ‘लेखानुदान’ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 02:44 IST

पुढीलवर्षी मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होत असतानाही केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरू केली आहे.

मुंबई : पुढीलवर्षी मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होत असतानाही केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरू केली आहे.सार्वत्रिक निवडणूक ज्यावर्षी होते त्यावर्षी सहसा सरकारकडून ‘लेखानुदान’ मांडले जाते. त्यामध्ये फक्त पुढील सरकार स्थापन होईपर्यंत असलेल्या अपेक्षित खर्चाचा तपशिल मांडला जातो. पण मोदी सरकारने मात्र १ फेब्रुवारीला २०१९-२० साठी पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने त्यांनी सर्व संबंधित विभागांना पत्र पाठविले आहे.केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्व सरकारी विभागांना १८ आॅक्टोबरला पत्र पाठविले आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी अपेक्षित असलेला खर्च व एकूण गरज, यासंबंधी विस्तृत मागण्या ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवल्या जाव्या, असे त्या पत्रात नमूद आहे. याखेरीज ‘लेखानुदान’ मांडायचे असल्यास केंद्र सरकार आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडत नाही. निवडणूक वर्षात आर्थिक सर्वेक्षण अहवाल निवडणुकीनंतर नवीन सरकारकडून मांडला जातो. पण ३१ जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण मांडण्यासाठी केंद्र सरकारने समितीची स्थापना केली आहे. मुख्य आर्थिक सल्लागारांच्या नियुक्तीसाठीही केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सल्लागारांची तीन वर्षांसाठी निवड करण्याचे केंद्राने निश्चित केले आहे. सरकारला केवळ ‘लेखानुदान’ मांडायचे असते तर त्यांनी आर्थिक सल्लागार निवडीची घाई केली नसती.लोकप्रिय घोषणांची शक्यताघडामोडींवरुनच केंद्र सरकार निवडणुकीला सामोरे जाण्याआधी पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची जय्यत तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक वर्ष असल्यानेच या पूर्ण अर्थसंकल्पात सरकार सर्वसामान्यांना आकर्षित करणाऱ्या लोकोपयोगी योजना मोठ्या प्रमाणात घोषित करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Parliamentसंसद