शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

लोकसभेत प्रचंड गदारोळ; दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग संदर्भातील विधेयक मंगळवारी मांडले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 18:16 IST

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील विधेयक आजऐवजी उद्या लोकसभेत मांडले जाणार आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार होते. पण, प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आल्याने विधेयक मांडता आले नाही. आता हे विधेयक उद्या म्हणजेच मंगळवारी मांडले जाणार आहे. सोमवारी विधेयक मांडण्यासाठी सर्व तयारीही झाली होती. विधेयकाची प्रत रविवारीच सर्व खासदारांना पाठवण्यात आली होती. मात्र सोमवारी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आल्याने विधेयक मांडता आले नाही. 

या विधेयकाला आम आदमी पक्षाकडून सुरुवातीपासून विरोध हो आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभर फिरून हे विधेयक रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यांचा पाठिंबा मागितला. त्यांना काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांना पाठिंबा दिला आहे. 

केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये वादया विधेयकावरुन केंद्र आणि केजरीवाल सरकारमध्ये दीर्घ काळापासून वाद सुरू आहे. गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (GNCTD) कायदा, 1991 दिल्लीतील विधानसभा आणि सरकारच्या कामकाजासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करण्यासाठी लागू आहे. 2021 मध्ये केंद्र सरकारने त्यात सुधारणा केली होती. या दुरुस्तीअंतर्गत दिल्लीतील सरकारच्या कामकाजाबाबत काही बदल करण्यात आले. यामध्ये उपराज्यपालांना काही अतिरिक्त अधिकार देण्यात आले. त्यानुसार निवडून आलेल्या सरकारला कोणत्याही निर्णयासाठी एलजीचे मत घेणे बंधनकारक करण्यात आले. 

यावर केजरीवाल सरकारने आक्षेप घेतला. याला आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती की, राजधानीतील जमीन आणि पोलिस यासारख्या काही बाबी वगळता इतर सर्व बाबींमध्ये दिल्लीच्या निवडून आलेल्या सरकारचे वर्चस्व असावे. केजरीवालांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात मोठा निकाल दिला. यानुसार, अधिकार्‍यांच्या नियुक्ती आणि बदलीचे अधिकार दिल्ली सरकारकडे आले. 

यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलण्यासाठी केंद्र सरकारने 19 मे रोजी अध्यादेश काढला. यामध्ये राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण (NCCSA) स्थापन करण्यास सांगितले. त्यात गट-अ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची जबाबदारी या प्राधिकरणाकडे देण्यात आली. म्हणजेच अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे गेले. आता हे विधेयक कायद्यात बदलण्यासाठी संसदेत मांडले जात आहे. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाCentral Governmentकेंद्र सरकारAAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा