शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत प्रचंड गदारोळ; दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग संदर्भातील विधेयक मंगळवारी मांडले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 18:16 IST

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील विधेयक आजऐवजी उद्या लोकसभेत मांडले जाणार आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार होते. पण, प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आल्याने विधेयक मांडता आले नाही. आता हे विधेयक उद्या म्हणजेच मंगळवारी मांडले जाणार आहे. सोमवारी विधेयक मांडण्यासाठी सर्व तयारीही झाली होती. विधेयकाची प्रत रविवारीच सर्व खासदारांना पाठवण्यात आली होती. मात्र सोमवारी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आल्याने विधेयक मांडता आले नाही. 

या विधेयकाला आम आदमी पक्षाकडून सुरुवातीपासून विरोध हो आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभर फिरून हे विधेयक रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यांचा पाठिंबा मागितला. त्यांना काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांना पाठिंबा दिला आहे. 

केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये वादया विधेयकावरुन केंद्र आणि केजरीवाल सरकारमध्ये दीर्घ काळापासून वाद सुरू आहे. गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (GNCTD) कायदा, 1991 दिल्लीतील विधानसभा आणि सरकारच्या कामकाजासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करण्यासाठी लागू आहे. 2021 मध्ये केंद्र सरकारने त्यात सुधारणा केली होती. या दुरुस्तीअंतर्गत दिल्लीतील सरकारच्या कामकाजाबाबत काही बदल करण्यात आले. यामध्ये उपराज्यपालांना काही अतिरिक्त अधिकार देण्यात आले. त्यानुसार निवडून आलेल्या सरकारला कोणत्याही निर्णयासाठी एलजीचे मत घेणे बंधनकारक करण्यात आले. 

यावर केजरीवाल सरकारने आक्षेप घेतला. याला आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती की, राजधानीतील जमीन आणि पोलिस यासारख्या काही बाबी वगळता इतर सर्व बाबींमध्ये दिल्लीच्या निवडून आलेल्या सरकारचे वर्चस्व असावे. केजरीवालांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात मोठा निकाल दिला. यानुसार, अधिकार्‍यांच्या नियुक्ती आणि बदलीचे अधिकार दिल्ली सरकारकडे आले. 

यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलण्यासाठी केंद्र सरकारने 19 मे रोजी अध्यादेश काढला. यामध्ये राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण (NCCSA) स्थापन करण्यास सांगितले. त्यात गट-अ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची जबाबदारी या प्राधिकरणाकडे देण्यात आली. म्हणजेच अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे गेले. आता हे विधेयक कायद्यात बदलण्यासाठी संसदेत मांडले जात आहे. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाCentral Governmentकेंद्र सरकारAAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा