शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

लोकसभेत प्रचंड गदारोळ; दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग संदर्भातील विधेयक मंगळवारी मांडले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 18:16 IST

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील विधेयक आजऐवजी उद्या लोकसभेत मांडले जाणार आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार होते. पण, प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आल्याने विधेयक मांडता आले नाही. आता हे विधेयक उद्या म्हणजेच मंगळवारी मांडले जाणार आहे. सोमवारी विधेयक मांडण्यासाठी सर्व तयारीही झाली होती. विधेयकाची प्रत रविवारीच सर्व खासदारांना पाठवण्यात आली होती. मात्र सोमवारी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आल्याने विधेयक मांडता आले नाही. 

या विधेयकाला आम आदमी पक्षाकडून सुरुवातीपासून विरोध हो आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभर फिरून हे विधेयक रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यांचा पाठिंबा मागितला. त्यांना काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांना पाठिंबा दिला आहे. 

केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये वादया विधेयकावरुन केंद्र आणि केजरीवाल सरकारमध्ये दीर्घ काळापासून वाद सुरू आहे. गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (GNCTD) कायदा, 1991 दिल्लीतील विधानसभा आणि सरकारच्या कामकाजासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करण्यासाठी लागू आहे. 2021 मध्ये केंद्र सरकारने त्यात सुधारणा केली होती. या दुरुस्तीअंतर्गत दिल्लीतील सरकारच्या कामकाजाबाबत काही बदल करण्यात आले. यामध्ये उपराज्यपालांना काही अतिरिक्त अधिकार देण्यात आले. त्यानुसार निवडून आलेल्या सरकारला कोणत्याही निर्णयासाठी एलजीचे मत घेणे बंधनकारक करण्यात आले. 

यावर केजरीवाल सरकारने आक्षेप घेतला. याला आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती की, राजधानीतील जमीन आणि पोलिस यासारख्या काही बाबी वगळता इतर सर्व बाबींमध्ये दिल्लीच्या निवडून आलेल्या सरकारचे वर्चस्व असावे. केजरीवालांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात मोठा निकाल दिला. यानुसार, अधिकार्‍यांच्या नियुक्ती आणि बदलीचे अधिकार दिल्ली सरकारकडे आले. 

यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलण्यासाठी केंद्र सरकारने 19 मे रोजी अध्यादेश काढला. यामध्ये राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण (NCCSA) स्थापन करण्यास सांगितले. त्यात गट-अ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची जबाबदारी या प्राधिकरणाकडे देण्यात आली. म्हणजेच अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे गेले. आता हे विधेयक कायद्यात बदलण्यासाठी संसदेत मांडले जात आहे. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाCentral Governmentकेंद्र सरकारAAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा