शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:08 IST

भारताची सीमा २२,६२३ किलोमीटर लांब आहे. यात बांग्लादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भुटान आणि अफगाणिस्तान या देशांसोबतची १५,१०६ किमी जमिनीवरील सीमा आहे.

नवी दिल्ली : सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि तस्करी थांबविण्यासाठी केंद्र सरकार भारतीय सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांना लिहिलेल्या पत्रानुसार, दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर भारतातही सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. 

दक्षिण आफ्रिकेत बॉर्डरच्या व्यवस्थापनासाठी साउथ आफ्रिकन बॉर्डर मॅनेजमेंट अथॉरिटी बनविण्यात आली आहे. याबाबत डॉ. गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले होते. शाह यांनी ही मागणी मान्य केली आहे.

भारताची सीमा २२,६२३ किलोमीटर लांब आहे. यात बांग्लादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भुटान आणि अफगाणिस्तान या देशांसोबतची १५,१०६ किमी जमिनीवरील सीमा आणि ७,५१६ किमी समुद्रीसीमेचा समावेश आहे. वेगवेगळ्या सीमांची सुरक्षा वेगवेगळ्या दलांमार्फत केली जाते. 

गृह मंत्रालयाच्या सीमा व्यवस्थापन विभागाने सीमेच्या रक्षणासाठी कुंपण, फ्लडलाइटिंग, रस्ते, सीमा चौकी, तंत्रज्ञान या उपाययोजना केल्या आहेत. 

यानंतरही, बेकायदेशीर स्थलांतर, ड्रग्ज व मानव तस्करी आणि घुसखोरी असे प्रकार घडतात. हे थांबविण्यासाठी सीमेचे रक्षण करणाऱ्या दलांचे एक प्राधिकरण बनविणे आवश्यक असल्याचे डॉ. गोपछडे यांनी लक्षात आणून दिले होते.

देशाला लागून सीमा व सुरक्षेची जबाबदारी

बांगलादेश, पाकिस्तान - सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)

चीन इंडो - तिबेटीयन बॉर्डर पोलिस

नेपाळ, भूतान - सशस्त्र सीमा बल

म्यानमार - आसाम रायफल्स

भारत-पाकिस्तान एलओसी - लष्कर

भारत-चीन एलएसी - लष्कर

सागरी सीमा - नौदल, तटरक्षक दल आणि राज्य (सागरी) पोलिस

टॅग्स :Borderसीमारेषाborder disputeसीमा वादPakistanपाकिस्तानchinaचीनHome Ministryगृह मंत्रालय