शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 06:21 IST

Modi Government news: नियुक्ती पद्धतीचे मूल्यांकन करणे, अनावश्यकता कमी करून प्रशासनाच्या गरजांशी कर्मचारी क्षमतांचे मूल्यांकन करणे यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली आहे.

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली प्रशासकीय सुधारणांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत मोदी सरकार कर्मचारी नियुक्तीची फेररचना करीत आहे. गृह मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी, आरोग्य, कृषी व  जैवतंत्रज्ञान यासह सहा प्रमुख मंत्रालये मनुष्यबळाचा अनुकूल वापर करण्यासाठी आढावा घेत आहेत. 

नियुक्ती पद्धतीचे मूल्यांकन करणे, अनावश्यकता कमी करून प्रशासनाच्या गरजांशी कर्मचारी क्षमतांचे मूल्यांकन करणे यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली आहे. याचे ध्येय केवळ संख्या कमी करणे नव्हे तर अकार्यक्षमता दूर करून कौशल्याधारित कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना करणे व प्रशासकीय कामाचा वेग वाढवणे, हे आहे. 

समितीच्या अहवालात सहा मंत्रालयातील कौशल्य बळकट करताना मंजूर पदांमध्ये गणनात्मक कपात सुचविण्यात आली आहे. याबरोबरच कौशल्य अनुकूलता आणि धोरणात्मक कार्यबल नियोजनाद्वारे भविष्यातील आव्हानांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना तयार करण्याची गरज, यावर भर देण्यात आला आहे. 

प्रत्येक चौथे सरकारी पद रिक्त

अनुकूल सरकार कर्मचारी भरती करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही मंजूर पदांपैकी जवळपास एक चतुर्थांश पदे रिक्त आहेत. 

अर्थमंत्रालयाने तयार केलेल्या अहवालानुसार, २०२३ पर्यंत ४०.३९ लाख मंजूर पदांपैकी २४.२१ टक्के जागा रिक्त होत्या. 

ब (एनजी) श्रेणीमध्ये रिक्त पदांचा दर सर्वाधिक ३३.४२ टक्के होता. त्यानंतर क श्रेणी (२३.७७ टक्के) आणि अ गट (२२.५४ टक्के) यांचा नंबर लागतो. 

टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी 

याचे नेतृत्व कॅबिनेट सचिवालय, कार्मिक व प्रशिक्षण विभाग आणि क्षमता निर्माण आयोग करीत आहे. 

समितीच्या अहवालात सहा मंत्रालयातील कौशल्य बळकट करताना मंजूर पदांमध्ये गणनात्मक कपात सुचविली आहे. 

भविष्यातील आव्हानांसाठी कर्मचाऱ्यांना तयार करण्यावर अहवालात भर देण्यात आला आहे. ही  पुनर्रचना टप्प्याटप्प्याने अंमलात आणली जाईल.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारी