शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

चित्ते भारतात वसवण्याची केंद्र सरकारची योजना; यशापयश दिसणार ५ ते ६ वर्षांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 06:12 IST

वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन.के. रणजित सिंह यांच्यासोबत वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. झाला यांनी २००९ पासून चित्ते भारतात वसवता येतील का, याची शक्यता शोधायला सुरुवात केली होती.

- शरद गुप्ता लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतात ७० वर्षांनंतर आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्याला निवासी बनवण्याची केंद्र सरकारची योजना भारतीय जंगलांना त्यांनी स्वीकारले, तर यशस्वी होऊ शकते. या योजनेचे यशापयश ५ ते ६ वर्षांनी समजू शकेल. देशात वेगवेगळ्या ठिकाणी गेंडे, वाघ, सिंह आणि पेंग्विनना वसवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत; परंतु एखाद दुसरा अपवाद वगळता बाकी अपयशी ठरले. म्हणून प्रोजेक्ट चित्त्याचे पितामह डॉ. वाय.व्ही. झाला हेदेखील याप्रकरणी सरकारला जपून पाऊल टाकण्याचा सल्ला देत आहेत.

वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन.के. रणजित सिंह यांच्यासोबत वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. झाला यांनी २००९ पासून चित्ते भारतात वसवता येतील का, याची शक्यता शोधायला सुरुवात केली होती. त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर जानेवारी, २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला मंजुरी दिली. डॉ. झाला म्हणतात, ‘आफ्रिकन चित्त्यांच्या तुलनेत इराणी चित्ते भारतात रुळवणे सोपे होऊ शकते. कारण त्यांचे जनुक (जीन) १९५२ मध्ये लुप्त झाले होते. ते जनुक भारतीय चित्त्यांशी मिळते-जुळते होते; परंतु इराणमध्ये आता केवळ ३० चित्तेच शिल्लक असून आम्हाला किमान ५० चित्ते हवे आहेत.’

ना सिंह वाचले, ना पेंग्विन उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी इटावात लायन सफारी बनवली होती; परंतु सगळे सिंह मरून गेले. महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी पेंग्विन आणण्याचा केलेला प्रयत्नही वाया गेला.