शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

चित्ते भारतात वसवण्याची केंद्र सरकारची योजना; यशापयश दिसणार ५ ते ६ वर्षांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 06:12 IST

वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन.के. रणजित सिंह यांच्यासोबत वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. झाला यांनी २००९ पासून चित्ते भारतात वसवता येतील का, याची शक्यता शोधायला सुरुवात केली होती.

- शरद गुप्ता लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतात ७० वर्षांनंतर आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्याला निवासी बनवण्याची केंद्र सरकारची योजना भारतीय जंगलांना त्यांनी स्वीकारले, तर यशस्वी होऊ शकते. या योजनेचे यशापयश ५ ते ६ वर्षांनी समजू शकेल. देशात वेगवेगळ्या ठिकाणी गेंडे, वाघ, सिंह आणि पेंग्विनना वसवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत; परंतु एखाद दुसरा अपवाद वगळता बाकी अपयशी ठरले. म्हणून प्रोजेक्ट चित्त्याचे पितामह डॉ. वाय.व्ही. झाला हेदेखील याप्रकरणी सरकारला जपून पाऊल टाकण्याचा सल्ला देत आहेत.

वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन.के. रणजित सिंह यांच्यासोबत वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. झाला यांनी २००९ पासून चित्ते भारतात वसवता येतील का, याची शक्यता शोधायला सुरुवात केली होती. त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर जानेवारी, २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला मंजुरी दिली. डॉ. झाला म्हणतात, ‘आफ्रिकन चित्त्यांच्या तुलनेत इराणी चित्ते भारतात रुळवणे सोपे होऊ शकते. कारण त्यांचे जनुक (जीन) १९५२ मध्ये लुप्त झाले होते. ते जनुक भारतीय चित्त्यांशी मिळते-जुळते होते; परंतु इराणमध्ये आता केवळ ३० चित्तेच शिल्लक असून आम्हाला किमान ५० चित्ते हवे आहेत.’

ना सिंह वाचले, ना पेंग्विन उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी इटावात लायन सफारी बनवली होती; परंतु सगळे सिंह मरून गेले. महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी पेंग्विन आणण्याचा केलेला प्रयत्नही वाया गेला.