शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकार काढणार सामाजिक सुरक्षा वटहुकूम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 07:10 IST

वेतन न मिळाल्याच्या अनेक तक्रारी; कामगार कपात टाळण्यासाठीचा उपाय

नवी दिल्ली : केंद्र सरकार मध्यम आणि लहान क्षेत्रासह औद्योगिक कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी अध्यादेश काढण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यवसायविषयक आरोग्य व सुरक्षिततेचे सध्या वेगवेगळे असलेले कायदे एकच केले जातील. कामगारांना वेतन न देणे, मालकांकडून हितरक्षणही न होणे, अशा भरपूर तक्रारी सध्या येत आहेत. या तक्रारी रोजंदारीवरील कामगारांशिवायच्या आहेत.

कोरोनामुळे देशात मोठ्या प्रमाणावर कामगार कपात होऊ नये (ती झाल्यास मोठा सामाजिक असंतोष निर्माण होईल) म्हणून हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे सरकारला जाणवले. सध्या १० दशलक्षांपेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना राज्याराज्यांत निवारागृहांत राहावे लागत आहे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था सरकार तसेच स्वयंसेवी संस्था करीत आहेत.देशात ९० टक्के कामगार असंघटितसंघटित क्षेत्रातील कंपन्यांना आपल्या कामगारांना कामावरून तात्पुरते दूर(ले आॅफ) करण्याचा पर्याय त्यांची कायदेशीर देणी दिल्यानंतर उपलब्ध आहे. परंतु, भारतात ९० टक्के कामगार हे असंघटित क्षेत्रातील असून ते सामाजिक सुरक्षेशी संबंधित कामगार कायद्यांच्या कक्षेत येत नाहीत.परंतु, अशा चार प्रस्तावांपैकी हा पहिलाच आहे. श्रम मंत्रालयाने ४४ कामगार कायदे चार कायद्यांत (वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षितता, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती) एकत्र करण्याचे ठरवले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMIDCएमआयडीसी