शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

शेतकऱ्यांवर कारवाई करण्याशिवाय पोलिसांकडे पर्याय नव्हता; सरकारची संसदेत माहिती

By देवेश फडके | Updated: February 2, 2021 20:15 IST

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूर सोडत कडक कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सरकारने समर्थन केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवरील कारवाईला केंद्र सरकारचे समर्थनजमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापरदिल्ली पोलिसांकडे दुसरा पर्याय नसल्याचे लिखित उत्तरात स्पष्ट

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूर सोडत कडक कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सरकारने समर्थन केले आहे. लोकसभेत यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर गृहमंत्रालयाने उत्तर दिले आहे. 

केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना गृहमंत्रालयाने सांगितले की, आंदोलनादरम्यान शेतकरी सरकारी संपत्तीची नासधूस करण्याचा प्रयत्न करत होते. आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची दाट शक्यता दिसून येत होती. त्यामुळे दिल्ली पोलिसांसमोर मोठी कारवाई करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नव्हता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

शिवसेना नेते दिल्लीच्या सीमेवर पोहोचले; शेतकरी नेते टिकैत भेटीबद्दल स्पष्टच बोलले

लिखित उत्तरात पुढे म्हटले आहे की, दिल्ली सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसखोरी करण्यासाठी अधिक आक्रमक झाले. सरकारी संपत्तीचे नुकसान केले. यावेळी तेथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर ईजा झाली. याशिवाय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक नियमांचे पालनही केले नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी मास्कही घातले केले नव्हते. मोठ्या प्रमाणावर असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आणि एकूण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला, असेही या उत्तरात सरकारकडून सांगण्यात आले. 

आदोलक शेतकऱ्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या कोणत्याच नियमांचे पालन केले नाही. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन प्रकरणी आतापर्यंत ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एका आत्महत्येच्या प्रकरणाचाही समावेश आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. शिवसेना नेत्यांनी दिल्लीतील गाझीपूर सीमेवरून जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्लीPoliceपोलिस