शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शेतकऱ्यांवर कारवाई करण्याशिवाय पोलिसांकडे पर्याय नव्हता; सरकारची संसदेत माहिती

By देवेश फडके | Updated: February 2, 2021 20:15 IST

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूर सोडत कडक कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सरकारने समर्थन केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवरील कारवाईला केंद्र सरकारचे समर्थनजमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापरदिल्ली पोलिसांकडे दुसरा पर्याय नसल्याचे लिखित उत्तरात स्पष्ट

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूर सोडत कडक कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सरकारने समर्थन केले आहे. लोकसभेत यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर गृहमंत्रालयाने उत्तर दिले आहे. 

केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना गृहमंत्रालयाने सांगितले की, आंदोलनादरम्यान शेतकरी सरकारी संपत्तीची नासधूस करण्याचा प्रयत्न करत होते. आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची दाट शक्यता दिसून येत होती. त्यामुळे दिल्ली पोलिसांसमोर मोठी कारवाई करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नव्हता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

शिवसेना नेते दिल्लीच्या सीमेवर पोहोचले; शेतकरी नेते टिकैत भेटीबद्दल स्पष्टच बोलले

लिखित उत्तरात पुढे म्हटले आहे की, दिल्ली सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसखोरी करण्यासाठी अधिक आक्रमक झाले. सरकारी संपत्तीचे नुकसान केले. यावेळी तेथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर ईजा झाली. याशिवाय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक नियमांचे पालनही केले नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी मास्कही घातले केले नव्हते. मोठ्या प्रमाणावर असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आणि एकूण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला, असेही या उत्तरात सरकारकडून सांगण्यात आले. 

आदोलक शेतकऱ्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या कोणत्याच नियमांचे पालन केले नाही. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन प्रकरणी आतापर्यंत ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एका आत्महत्येच्या प्रकरणाचाही समावेश आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. शिवसेना नेत्यांनी दिल्लीतील गाझीपूर सीमेवरून जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्लीPoliceपोलिस