शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

पंचायत निवडणुकांमध्ये केंद्रीय दल तैनात होणार; पश्चिम बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 14:24 IST

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका येत्या ८ जुलैला होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे.

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती केली जाणार आहे. यामुळे ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.  बंगालच्या प्रत्येक राज्यात केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती केली जावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

पश्चिम बंगाल सरकारला फटकारताना न्यायालयाने निवडणुका घेणे म्हणजे हिंसाचार करण्याचे लायसन नाहीय असे सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय़ दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याची जबाबदारी पार पाडण्यास मदत होईल. संवेदनशील नसलेल्या भागातही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होतील, असे न्यायालय म्हणाले. 

कोलकाता उच्च न्यायालयाने ४८ तासांच्या आत प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 15 जून रोजी उच्च न्यायालयाने 48 तासांच्या आत निमलष्करी दल तैनात करण्याचे आदेश दिले होते. 

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका येत्या ८ जुलैला होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. राज्यभरातील १८९ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. राज्यात 2013 आणि 2018 मध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान हिंसाचार झाला होता. हा इतिहास पाहता मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. 

ज्या ठिकाणी संवेदनशील केंद्रे आहेत, त्या ठिकाणी आम्ही सुरक्षा तैनात करू. परंतू ज्या ठिकाणी सामान्य वातावरण आहे तिथे केंद्राची सुरक्षा तैनात केली तर वातावरण बिघडू शकते, गेल्या वेळेला केंद्रीय सुरक्षा दलांनी लोकांवर गोळीबार केला होता, असे सांगत पश्चिम बंगाल सरकारने यास विरोध केलो होता. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालSupreme Courtसर्वोच्च न्यायालय