शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पंचायत निवडणुकांमध्ये केंद्रीय दल तैनात होणार; पश्चिम बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 14:24 IST

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका येत्या ८ जुलैला होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे.

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती केली जाणार आहे. यामुळे ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.  बंगालच्या प्रत्येक राज्यात केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती केली जावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

पश्चिम बंगाल सरकारला फटकारताना न्यायालयाने निवडणुका घेणे म्हणजे हिंसाचार करण्याचे लायसन नाहीय असे सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय़ दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याची जबाबदारी पार पाडण्यास मदत होईल. संवेदनशील नसलेल्या भागातही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होतील, असे न्यायालय म्हणाले. 

कोलकाता उच्च न्यायालयाने ४८ तासांच्या आत प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 15 जून रोजी उच्च न्यायालयाने 48 तासांच्या आत निमलष्करी दल तैनात करण्याचे आदेश दिले होते. 

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका येत्या ८ जुलैला होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. राज्यभरातील १८९ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. राज्यात 2013 आणि 2018 मध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान हिंसाचार झाला होता. हा इतिहास पाहता मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. 

ज्या ठिकाणी संवेदनशील केंद्रे आहेत, त्या ठिकाणी आम्ही सुरक्षा तैनात करू. परंतू ज्या ठिकाणी सामान्य वातावरण आहे तिथे केंद्राची सुरक्षा तैनात केली तर वातावरण बिघडू शकते, गेल्या वेळेला केंद्रीय सुरक्षा दलांनी लोकांवर गोळीबार केला होता, असे सांगत पश्चिम बंगाल सरकारने यास विरोध केलो होता. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालSupreme Courtसर्वोच्च न्यायालय