शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

पंचायत निवडणुकांमध्ये केंद्रीय दल तैनात होणार; पश्चिम बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 14:24 IST

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका येत्या ८ जुलैला होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे.

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती केली जाणार आहे. यामुळे ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.  बंगालच्या प्रत्येक राज्यात केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती केली जावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

पश्चिम बंगाल सरकारला फटकारताना न्यायालयाने निवडणुका घेणे म्हणजे हिंसाचार करण्याचे लायसन नाहीय असे सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय़ दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याची जबाबदारी पार पाडण्यास मदत होईल. संवेदनशील नसलेल्या भागातही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होतील, असे न्यायालय म्हणाले. 

कोलकाता उच्च न्यायालयाने ४८ तासांच्या आत प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 15 जून रोजी उच्च न्यायालयाने 48 तासांच्या आत निमलष्करी दल तैनात करण्याचे आदेश दिले होते. 

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका येत्या ८ जुलैला होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. राज्यभरातील १८९ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. राज्यात 2013 आणि 2018 मध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान हिंसाचार झाला होता. हा इतिहास पाहता मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. 

ज्या ठिकाणी संवेदनशील केंद्रे आहेत, त्या ठिकाणी आम्ही सुरक्षा तैनात करू. परंतू ज्या ठिकाणी सामान्य वातावरण आहे तिथे केंद्राची सुरक्षा तैनात केली तर वातावरण बिघडू शकते, गेल्या वेळेला केंद्रीय सुरक्षा दलांनी लोकांवर गोळीबार केला होता, असे सांगत पश्चिम बंगाल सरकारने यास विरोध केलो होता. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालSupreme Courtसर्वोच्च न्यायालय