शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सीबीआय अधिकाऱ्यांच्या वादात केंद्राची भूमिका नाही -जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 05:11 IST

सीबीआयमधील दोन अधिका-यांच्या संघर्षात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्यात हस्तक्षेप करण्याचाही सरकारचा इरादा नाही.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : सीबीआयमधील दोन अधिका-यांच्या संघर्षात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्यात हस्तक्षेप करण्याचाही सरकारचा इरादा नाही. अशा घटनांबाबत केंद्रीय दक्षता आयोग ही सुपरवायझरी अ‍ॅथॉरिटी आहे. आयोगाची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर बुधवारी सरकारने दोन्ही अधिकाºयांना सदर प्रकरणाची चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आलोक वर्मा व राकेश अस्थाना यांचे अधिकार काढून घेतले आहेत, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी केले. विधिमंत्री रविशंकर प्रसादही यावेळी उपस्थित होते.सीबीआय यंत्रणेत क्रमांक १ व २ च्या अधिकाºयांतील वादामुळे विचित्र व दुर्भाग्यपूर्ण स्थिती निर्माण झाली. संचालकांनी आपल्या विशेष संचालकांवर आरोप केले आहेत. याची चौकशी नेमकी कोण करणार? हा सरकारला पडलेला प्रश्न होता, कारण केंद्राच्या अधिकारकक्षेत हा विषय येत नाही. त्यामुळे सरकार त्यांची चौकशी करणार नाही. असे स्पष्ट करीत जेटली म्हणाले की, सीबीआय ही अग्रगण्य तपास यंत्रणा आहे. यंत्रणेची प्रतिष्ठा कायम राहावी हा सरकारचा हेतू आहे, त्यासाठी केंद्र सरकार सर्वार्थाने तत्पर आहे. दक्षता आयोगाने मंगळवारच्या बैठकीनंतर सरकारला सांगितले की, या प्रकरणांची चौकशी दोन्ही अधिकारी करू शकणार नाहीत. या अधिकाºयांच्या नेतृत्वाखालील पथकालाही चौकशीत भाग घेता येणार नाही असे नमूद करीत जेटली म्हणाले की, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या दोन्ही अधिकाºयांना आपल्या कामकाजातून मुक्त करून सीबीआयपासून दूर ठेवण्यात आले.>...तर पुन्हा येऊ शकतीलनि:पक्षपाती चौकशीसाठी तसे करणे आवश्यकच होते. या प्रकरणाची चौकशी आता स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम (एसआयटी)करील. दोन्ही अधिकाºयांना केंद्र सरकार दोषी मानत नाही. चौकशीची प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या पूर्ण व्हावी यासाठीच त्यांना दूर केले आहे. चौकशीत दोघांच्याही विरोधात काही न आढळल्यास वा प्रश्नचिन्ह शिल्लक न राहिल्यास ते पुन्हा कार्यभार स्वीकारू शकतील, असेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली