शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय अधिकाऱ्यांच्या वादात केंद्राची भूमिका नाही -जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 05:11 IST

सीबीआयमधील दोन अधिका-यांच्या संघर्षात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्यात हस्तक्षेप करण्याचाही सरकारचा इरादा नाही.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : सीबीआयमधील दोन अधिका-यांच्या संघर्षात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्यात हस्तक्षेप करण्याचाही सरकारचा इरादा नाही. अशा घटनांबाबत केंद्रीय दक्षता आयोग ही सुपरवायझरी अ‍ॅथॉरिटी आहे. आयोगाची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर बुधवारी सरकारने दोन्ही अधिकाºयांना सदर प्रकरणाची चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आलोक वर्मा व राकेश अस्थाना यांचे अधिकार काढून घेतले आहेत, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी केले. विधिमंत्री रविशंकर प्रसादही यावेळी उपस्थित होते.सीबीआय यंत्रणेत क्रमांक १ व २ च्या अधिकाºयांतील वादामुळे विचित्र व दुर्भाग्यपूर्ण स्थिती निर्माण झाली. संचालकांनी आपल्या विशेष संचालकांवर आरोप केले आहेत. याची चौकशी नेमकी कोण करणार? हा सरकारला पडलेला प्रश्न होता, कारण केंद्राच्या अधिकारकक्षेत हा विषय येत नाही. त्यामुळे सरकार त्यांची चौकशी करणार नाही. असे स्पष्ट करीत जेटली म्हणाले की, सीबीआय ही अग्रगण्य तपास यंत्रणा आहे. यंत्रणेची प्रतिष्ठा कायम राहावी हा सरकारचा हेतू आहे, त्यासाठी केंद्र सरकार सर्वार्थाने तत्पर आहे. दक्षता आयोगाने मंगळवारच्या बैठकीनंतर सरकारला सांगितले की, या प्रकरणांची चौकशी दोन्ही अधिकारी करू शकणार नाहीत. या अधिकाºयांच्या नेतृत्वाखालील पथकालाही चौकशीत भाग घेता येणार नाही असे नमूद करीत जेटली म्हणाले की, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या दोन्ही अधिकाºयांना आपल्या कामकाजातून मुक्त करून सीबीआयपासून दूर ठेवण्यात आले.>...तर पुन्हा येऊ शकतीलनि:पक्षपाती चौकशीसाठी तसे करणे आवश्यकच होते. या प्रकरणाची चौकशी आता स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम (एसआयटी)करील. दोन्ही अधिकाºयांना केंद्र सरकार दोषी मानत नाही. चौकशीची प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या पूर्ण व्हावी यासाठीच त्यांना दूर केले आहे. चौकशीत दोघांच्याही विरोधात काही न आढळल्यास वा प्रश्नचिन्ह शिल्लक न राहिल्यास ते पुन्हा कार्यभार स्वीकारू शकतील, असेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली