शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

केंद्राची लंच डिप्लोमसी; सातव्या फेरीतही ताेडगा निघाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 06:54 IST

विकास झाडे नवी दिल्ली : शेतीविषयक कायदे  रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र  सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा  ...

विकास झाडेनवी दिल्ली : शेतीविषयक कायदे  रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र  सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा  अद्याप कायम आहे. बुधवारी  झालेल्या चर्चेच्या सातव्या फेरीत यासंदर्भात तोडगा निघू शकला नाही. केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही तर शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावर अडून आहेत. ‘एमएसपी’बाबत शेतकऱ्यांना कायदा हवा आहे तर सरकार केवळ लेखी द्यायला तयार आहे. आता पुढील बैठक ४ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांशी चर्चा करणाऱ्या मंत्रिगटाने बुधवारी शेतकऱ्यांबरोबर दुपारचे भोजन घेतले. 

विज्ञान भवनात बुधवारी शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी दीर्घ चर्चा केली. कायदे तयार करणे आणि रद्द करणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मागण्यांसदर्भात एक समिती तयार करण्याची सरकारने तयारी दर्शविली. वीज अधिनियम सुधारणा कायदा रद्द करण्याबाबत सरकारकडून आश्वासन देण्यात आले. दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक  तरतुदी मागे घेण्याबाबतही मंत्र्यानी आश्वासन दिले.

शेतकऱ्यांसोबत  मंत्र्यांचे सहभोजन 

याआधीच्या बैठकांमध्ये सरकारचे जेवण नाकारणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवारी विज्ञानभवनात मंत्र्यांनी सुखद धक्का दिला. नरेंद्रसिंह तोमर आणि पीयूष गोयल यांनी शेतकऱ्यांसाठी लंगरमधून आलेल्या जेवणाचा आस्वाद घेतल्याने माहोलच बदलला.  नेहमीप्रमाणे लंगरमध्ये बनलेले जेवण शेतकऱ्यांसाठी विज्ञानभवनात आणण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनीच मंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण दिले.  मंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांचे निमंत्रण स्वीकारले. सायंकाळी शेतकऱ्यांनीही मंत्र्यांचा सन्मान ठेवत ‘सरकारी’ चहा घेतला. 

विरोधी पक्षाने तंबूत बसून निदर्शने करावीत

या देशात मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे सरकारवर दबाव आणता येईल. परंतु तसे चित्र नाही. विरोधी पक्ष दमदार नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. विरोधी पक्षाने तंबूत बसून निदर्शने करण्यासारखी स्थिती असल्याची टीका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकार