शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

केंद्राची लंच डिप्लोमसी; सातव्या फेरीतही ताेडगा निघाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 06:54 IST

विकास झाडे नवी दिल्ली : शेतीविषयक कायदे  रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र  सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा  ...

विकास झाडेनवी दिल्ली : शेतीविषयक कायदे  रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र  सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा  अद्याप कायम आहे. बुधवारी  झालेल्या चर्चेच्या सातव्या फेरीत यासंदर्भात तोडगा निघू शकला नाही. केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही तर शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावर अडून आहेत. ‘एमएसपी’बाबत शेतकऱ्यांना कायदा हवा आहे तर सरकार केवळ लेखी द्यायला तयार आहे. आता पुढील बैठक ४ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांशी चर्चा करणाऱ्या मंत्रिगटाने बुधवारी शेतकऱ्यांबरोबर दुपारचे भोजन घेतले. 

विज्ञान भवनात बुधवारी शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी दीर्घ चर्चा केली. कायदे तयार करणे आणि रद्द करणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मागण्यांसदर्भात एक समिती तयार करण्याची सरकारने तयारी दर्शविली. वीज अधिनियम सुधारणा कायदा रद्द करण्याबाबत सरकारकडून आश्वासन देण्यात आले. दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक  तरतुदी मागे घेण्याबाबतही मंत्र्यानी आश्वासन दिले.

शेतकऱ्यांसोबत  मंत्र्यांचे सहभोजन 

याआधीच्या बैठकांमध्ये सरकारचे जेवण नाकारणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवारी विज्ञानभवनात मंत्र्यांनी सुखद धक्का दिला. नरेंद्रसिंह तोमर आणि पीयूष गोयल यांनी शेतकऱ्यांसाठी लंगरमधून आलेल्या जेवणाचा आस्वाद घेतल्याने माहोलच बदलला.  नेहमीप्रमाणे लंगरमध्ये बनलेले जेवण शेतकऱ्यांसाठी विज्ञानभवनात आणण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनीच मंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण दिले.  मंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांचे निमंत्रण स्वीकारले. सायंकाळी शेतकऱ्यांनीही मंत्र्यांचा सन्मान ठेवत ‘सरकारी’ चहा घेतला. 

विरोधी पक्षाने तंबूत बसून निदर्शने करावीत

या देशात मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे सरकारवर दबाव आणता येईल. परंतु तसे चित्र नाही. विरोधी पक्ष दमदार नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. विरोधी पक्षाने तंबूत बसून निदर्शने करण्यासारखी स्थिती असल्याची टीका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकार