शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

काश्मीरच्या निवडणुकांसाठी केंद्र तयार, गृहमंत्री राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 05:13 IST

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर, राज्यात कोणत्याही पक्षाने सरकार बनवण्याचा दावा केला नाही.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर, राज्यात कोणत्याही पक्षाने सरकार बनवण्याचा दावा केला नाही. राज्यात भाजपला सरकार बनवायचे असते, तर ६ महिन्यांच्या कालावधीत तसा प्रयत्न पक्षाने नक्कीच केला असता; मात्र भाजपने तसा कोणताही प्रयत्न केला नाही. राज्यपालांनी वास्तव परिस्थितीचा अहवाल केंद्राकडे पाठवला. अशा स्थितीत राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ चा अवलंब करण्याशिवाय केंद्राकडेही पर्याय राहिला नाही. निवडणुकीसाठी केंद्र सरकार सर्वार्थाने तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी लोकसभेत केले. जम्मू-काश्मीरमधे अनुच्छेद ३५६ अन्वये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर या घटनात्मक प्रक्रियेला संसदेच्या मंजुरीसाठी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राजनाथसिंग बोलत होते.जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित व्हावी, राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. निवडणुका आयोजित करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे; मात्र या निवडणुकांसाठी आयोगाने सरकारकडे सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली, तर ती पुरवण्यास केंद्र सरकार सदैव तयार आहे, असे नमूद करीत गृहमंत्री म्हणाले, सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन दोनदा मी काश्मीरला गेलो.समाधानकारक तोडगा काढूकाश्मीरची स्थिती अतिशय नाजूक होती तेव्हा लवकरात लवकर ती सुधारावी, अशीच सरकारची प्रामाणिक इच्छा होती. सर्वपक्षीय शिष्टमंडळातले काही नेते फुटीरवादी गटांनाही भेटायला गेले होते. तेथून त्यांना कसे परतावे लागले, याचा उल्लेख ते करीत नाहीत. विद्यमान स्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये लोकतंत्र मजबूत व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे.सर्वच राजकीय पक्षांना माझे आवाहन आहे की, काश्मीरची स्थिती सामान्य व्हावी, यासाठी नेमके काय केले पाहिजे, याबद्दल आपल्या सूचना अवश्य करा. समाधानकारक तोडगा काढण्याचा गृहमंत्री या नात्याने मी व्यक्तिश: प्रयत्न करायला तयार आहे. अनुच्छेद ३५६ बाबत काश्मीरविषयक चर्चेत समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, राजदचे जयप्रकाश नारायण सिंग यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी, अद्रमुक आदी पक्षांच्या खासदारांनी भाग घेतला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीर