शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

काश्मीरच्या निवडणुकांसाठी केंद्र तयार, गृहमंत्री राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 05:13 IST

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर, राज्यात कोणत्याही पक्षाने सरकार बनवण्याचा दावा केला नाही.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर, राज्यात कोणत्याही पक्षाने सरकार बनवण्याचा दावा केला नाही. राज्यात भाजपला सरकार बनवायचे असते, तर ६ महिन्यांच्या कालावधीत तसा प्रयत्न पक्षाने नक्कीच केला असता; मात्र भाजपने तसा कोणताही प्रयत्न केला नाही. राज्यपालांनी वास्तव परिस्थितीचा अहवाल केंद्राकडे पाठवला. अशा स्थितीत राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ चा अवलंब करण्याशिवाय केंद्राकडेही पर्याय राहिला नाही. निवडणुकीसाठी केंद्र सरकार सर्वार्थाने तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी लोकसभेत केले. जम्मू-काश्मीरमधे अनुच्छेद ३५६ अन्वये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर या घटनात्मक प्रक्रियेला संसदेच्या मंजुरीसाठी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राजनाथसिंग बोलत होते.जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित व्हावी, राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. निवडणुका आयोजित करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे; मात्र या निवडणुकांसाठी आयोगाने सरकारकडे सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली, तर ती पुरवण्यास केंद्र सरकार सदैव तयार आहे, असे नमूद करीत गृहमंत्री म्हणाले, सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन दोनदा मी काश्मीरला गेलो.समाधानकारक तोडगा काढूकाश्मीरची स्थिती अतिशय नाजूक होती तेव्हा लवकरात लवकर ती सुधारावी, अशीच सरकारची प्रामाणिक इच्छा होती. सर्वपक्षीय शिष्टमंडळातले काही नेते फुटीरवादी गटांनाही भेटायला गेले होते. तेथून त्यांना कसे परतावे लागले, याचा उल्लेख ते करीत नाहीत. विद्यमान स्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये लोकतंत्र मजबूत व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे.सर्वच राजकीय पक्षांना माझे आवाहन आहे की, काश्मीरची स्थिती सामान्य व्हावी, यासाठी नेमके काय केले पाहिजे, याबद्दल आपल्या सूचना अवश्य करा. समाधानकारक तोडगा काढण्याचा गृहमंत्री या नात्याने मी व्यक्तिश: प्रयत्न करायला तयार आहे. अनुच्छेद ३५६ बाबत काश्मीरविषयक चर्चेत समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, राजदचे जयप्रकाश नारायण सिंग यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी, अद्रमुक आदी पक्षांच्या खासदारांनी भाग घेतला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीर