शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी केंद्रच सुप्रीम कोर्टात; कर्नाटक, यूपीतील राखीव जागाही रद्द होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 05:37 IST

कर्नाटक, उत्तर प्रदेशात ओबीसी आरक्षण रद्द झाल्यास भाजपची अडचण होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर तसेच कर्नाटक व उत्तर प्रदेशच्या बाबतीतही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारसर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका सादर करून सर्वच राज्यांतील ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने म्हटले आहे की. तसा प्रयत्न सर्वांनी मिळून करायला हवा, मात्र ओबीसी आरक्षणासाठी सर्वच राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले नियम व अटी यांचे पालन करायला हवे. केंद्रीय सामाजिक मंत्रालयाने म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण कायम राहावे, यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याच्या विचारात आहोत. कायदा मंत्रालय तसेच संबंधित अन्य खात्यांशी चर्चेची प्रक्रिया आम्ही सुरूही केली आहे. 

महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींसाठीचे २७ टक्के आरक्षण न्यायालयाने रद्दबातल ठरविले आहे. त्यानुसार महाराष्ट्राने ओबीसींसाठीच्या राखीव जागा रद्द केल्या आणि त्या सर्वसाधारण प्रवर्गात टाकल्या. मध्य प्रदेश निवडणूक आयोगानेही याच निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या वॉर्डांमध्ये १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेशात ओबीसी आरक्षण रद्द झाल्यास भाजपची अडचण होईल. त्यामुळेच केंद्र सरकार त्यातून मार्ग काढू पाहत आहे.

डेटा मिळाला असता तर...

ओबीसी आरक्षण कायम राहावे, यासाठी महाराष्ट्र प्रयत्न करीत होते. केंद्राकडून इंपिरिकल डेटा मिळवण्यासाठीही महाराष्ट्राने न्यायालयात धाव घेतली होती. पण तो जनगणनेचा डेटा नाही आणि त्यात त्रुटी आहेत, अशी भूमिका केंद्राने घेतली. त्यामुळे मागासवर्गीयांसंबंधीची माहिती राज्याला मिळू शकली नाही. ती मिळाली असती तर ओबीसी आरक्षणातील अडथळे दूर झाले असते, असे महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्याने सांगितले. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार