शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आता खाद्यतेल महागणार नाही; दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 08:52 IST

खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय; केंद्रीय ग्राहक मंत्रालयाकडून आदेश जारी

नवी दिल्ली: पेट्रोल डिझेलच्या किमती गेल्या तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. त्यानंतर आता केंद्र सरकारनं खाद्यतेलांच्या किमती कमी नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खाद्य तेल आणि तेलबियांची साठवणूक करण्याचा आदेश राज्यांना दिला आहे. पुरवठा साखळी आणि व्यापार यांना बाधा न आणता आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश सरकारनं काढला आहे. बुधवारी याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आली. 

खाद्य तेल आणि तेलबिया यांच्या साठवणुकीची मर्यादा तीन महिन्यांनी वाढवली आहे. आदेशात साठवणुकीच्या मर्यादेचाही उल्लेख आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयानं मंगळवारी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांशी यासंदर्भात बैठक घेऊन योजनेच्या अंमलबजावणीची चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. 'राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी साठवणूक मर्यादेचा आदेश लागू करावा. हा आदेश लागू करताना पुरवठा साखळी आणि व्यापारात कोणतीही अडचण येणार नाही याची खातरजमा करून घ्यावी यावर बैठकीत भर देण्यात आला,' अशी माहिती मंत्रालयानं दिली.

यामुळे साठेबाजी, काळाबाजारावर अंकुश येईल, अशी आशा मंत्रालयानं व्यक्त केली. खाद्य तेलांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींची आणि परिस्थितीची माहिती राज्यांना केंद्रीय मंत्रालयाकडून देण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर भारतीय बाजारपेठेवर कशाप्रकारे परिणाम करू शकतात याचीदेखील माहिती दिली गेली.