शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

काश्मीरमध्ये भारतद्वेषाचं विष पेरणाऱ्या दहशतवाद्यांना झटका; लष्कराचा 'हा' निर्णय देणार धक्का!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 09:40 IST

लष्करी कारवाईत दहशतवादी मारला जातो, तेव्हा दहशतवादी संघटनांना आयतीच संधी मिळते. या अंत्ययात्रांचे व्हिडीओ आणि तरुणांची माथी भडकवणारे मेसेज सोशल मीडियावर फिरवले जातात.

नवी दिल्लीः लष्करी कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या मोठमोठ्या अंत्ययात्रा काढायच्या आणि काश्मिरातील तरुणांच्या मनात भारतद्वेषाचं विष पेरायचं, ही दहशतवादी संघटनांची चाल ओळखून केंद्र सरकार आणि भारतीय लष्कराचे बडे अधिकारी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्याची परंपरा थांबवण्याचा विचार सरकार करतंय. या दहशतवाद्यांचे मृतदेह अज्ञात ठिकाणी दफन केले जातील आणि पुढचा धोका टळू शकेल.

काश्मीर खोऱ्यात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बूल मुजाहिदीन आणि अल बद्र या दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. काश्मिरातील तरुणांना भारताविरुद्ध चिथावणी द्यायची आणि आपल्यासोबत घ्यायचं, हे काम करणारे बरेच हस्तक खोऱ्यात फिरत असतात. लष्करी कारवाईत दहशतवादी मारला जातो, तेव्हा त्यांना आयतीच संधी मिळते. कारण, या दहशतवाद्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवला जातो आणि मग अंत्ययात्रेत (जनाजा) हे हस्तक तरुणांचं 'ब्रेनवॉश' सुरू करतात. या अंत्ययात्रांचे व्हिडीओ आणि तरुणांची माथी भडकवणारे मेसेज सोशल मीडियावर फिरवले जातात. परिणामी, 'ऑपरेशन ऑल-आउट'मुळे एकीकडे दहशतवादी मारले जातात, पण दुसरीकडे नवी फळी तयारही होते. 

दहशतवाद्यांची ही 'भरती मोहीम' रोखण्यासाठीही लष्कर प्रयत्नशील आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून, दहशतवाद्यांचे मृतदेह कुटुंबीयांकडे न सोपवण्याचा विचार सुरू आहे. 

2018 मध्ये विविध दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झालेल्या काश्मिरी तरुणांची संख्या 80 इतकी आहे. 2017 मध्ये 126 जण दहशतवाद्यांच्या गळाला लागले होते. 2014 पासून लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केलीय आणि सोशल मीडियाचं प्रस्थही वाढलंय. या घडामोडी दहशतवादी संघटनांच्या पथ्यावरच पडल्यात. त्यामुळे आता, सरकारचं नवं पाऊल त्यांना झटका देऊ शकेल का, हे पाहावं लागेल.  

टॅग्स :TerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर