शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

ओझर टाऊनशिप येथे महात्मा फुले जयंती साजरी

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

ओझरटाऊनशिप : येथील महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने व एच. ए. ई. डब्ल्यू. आर. सी. संस्थेच्या सौजन्याने महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने ८० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये किमतीच्या शालेय वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

ओझरटाऊनशिप : येथील महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने व एच. ए. ई. डब्ल्यू. आर. सी. संस्थेच्या सौजन्याने महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने ८० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये किमतीच्या शालेय वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
एच. ए. एल. चे अतिरिक्त महाव्यवस्थापक आप्पासाहेब मालगौंडनवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या किनो थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डिव्हिजनल पी. एफ. कमिशनर जगदीश तांबे सिन्नर महाविद्यालयाचे प्राध्यापक जावेद शेख, कामगार संघटनेचे बी. व्ही. शेळके, अतिरिक्त महाप्रबंधक एस. पी. सिंग, चंद्रकांत गांगुर्डे यांचेसह व्यासपीठावर कामगार संघटनेचे प्रभारी सरचिटणीस अनिल मंडलिक, अधिकारी संघटनेचे एस. कालीमूतू, एच. ए. ई. डब्ल्यू. आर. सी. चे सरचिटणीस लक्ष्मीकांत खैरनार, युवा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कुटे, ग्रामपालिका सदस्य राजू मंडलिक, ओ.बी.सी. संघटना अध्यक्ष भावेश विसपुते, सरचिटणीस राजू माळी, मराठा महासंघ अध्यक्ष संदीप कदम, एक्स सर्व्हिसमन अध्यक्ष आप्पा जाधव, डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव समिती अध्यक्ष मदन जाधव, राहुल कोळपकर आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पवार, जाधव व शिंदे यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी आलेल्या विविध संस्थांच्या आलेल्या शुभ संदेशांचे वाचन मुकुंद शेटे यांनी केले. त्यानंतर समितीच्या वतीने वरील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकून फुले यांच्या आचार-विचारांचे सर्वांनी आचरण करावे असे आवाहन आप्पासाहेब मालगौंडनवल यांनी अध्यक्षपदावरुन बोलताना केले.
यावेळी प्राध्यापक जावेद शेख यांचे व्याख्यान झाले. तसेच अनिल मंडलिक, जगदीश तांबे, नितीन पाटील, शेळके, कालीमूतू, एस. पी. सिंग आदिंची भाषणे झाली.
उत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार अन्नसेवा समिती नाशिकचे च‹ा यांना त्याचप्रमाणे भगवान हिरे, श्रीमती संध्या भोजने, आशा मानकर, मारुती शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, रांगोळी आदि स्पर्धातील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. समाजातील दारिद्र्य रेषेखाली ८० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये किमतीच्या शालेय वस्तंूचे किट वाटप करण्यात आले.