शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
4
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
5
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
6
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
7
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
8
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
9
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
10
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
11
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
12
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
13
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
14
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
15
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
16
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
17
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
18
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
19
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
20
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक

मोदी विरुद्ध दिदी; जाणून घ्या कुठे, कधी आणि कशी पडली वादाची ठिणगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 09:44 IST

मोदी आणि ममता यांच्यातल्या संघर्षामागे गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी आहेत.

कोलकाता/नवी दिल्ली: शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं बंगालमध्ये मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास सुरुवात केली आहे. तर कारवाईस अटकाव करण्यात आल्यानंतर सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. 2016 पासून हा संघर्ष सुरू झाला. केंद्र आणि राज्य सरकारमधील या संघर्षाची ठिणगी एका घोटाळ्यामुळे पडली. 2013 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला. शारदा चिट फंड नावानं ओळखल्या जाणाऱ्या या घोटाळ्यात तृणमूलच्या अनेक नेत्यांची नावं समोर आली. सत्ताधाऱ्यांच्या आशीवार्दामुळेच हा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपानं अनेकदा केला. लोकसभा निवडणुकीत भाजपानं यावरुन वातावरण तापवलं. मात्र यानतंरही राज्यातील 42 पैकी 34 जागांवर तृणमूलचे उमेदवार विजयी झाले.मोदी सरकारनं शारदा चिट फंड घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपवली आणि मोदी विरुद्ध दिदी हा वाद आणखी पेटला. 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळच्या प्रचारादरम्यानही भाजपानं पुन्हा हे प्रकरण लावून धरलं. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या निवडणुकीत भाजपाच्या मतांमध्ये जवळपास 6.10 टक्क्यांनी वाढ झाली. मात्र ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या जागांमध्ये 27 नं वाढ झाली आणि त्यांनी 294 पैकी 211 खिशात घातल्या. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अपयशी ठरलेल्या भाजपानं 2018 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड जोर लावला. या दरम्यान काही भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. या निवडणुकीतही तृणमूल सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र भाजपानं काँग्रेस आणि डाव्यांना मागे टाकलं. त्यामुळे राज्यात भाजपा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला. यानंतर या दोन पक्षांमधील वाद वाढतच गेला. नव्या वर्षात मोदी विरुद्ध ममता या संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळाला. 19 जानेवारीला ममता बॅनर्जींनी विरोधकांच्या महारॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी व्यासपीठावर देशातील 20 पक्षांचे नेते उपस्थित होते. मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे, अशी टीका त्या सभेत ममता यांनी केली. यानंतर पंतप्रधान मोदींची पश्चिम बंगालमध्ये सभा झाली. या सभेत मोदींनी ममतांना लक्ष्य केलं. 'दिदींना हिंसाचाराचा आधार का घ्यावा लागतोय, हे समोर उपस्थित असलेला हा जनसमुदाय पाहून माझ्या लक्षात येतंय. ही गर्दी माझ्यावर असलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि त्याचीच दिदींना भीती वाटतेय,' अशी टीका मोदींनी केली. 

मोदींनी शनिवारी (2 फेब्रुवारी) ममतांवर शरसंधान साधलं. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शारदा चिट फंड प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचे अधिकारी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी आले. मात्र राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या कारवाईविरोधात ममता बॅनर्जींनी धरणं आंदोलन सुरू केलं. मोदी आणि शहांच्या इशाऱ्यावरुनच सीबीआयची कारवाई सुरू असल्याचा स्पष्ट आरोप ममतांनी आंदोलनादरम्यान केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणElectionनिवडणूक