शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

सीबीआय करणार व्यापमची चौकशी - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: July 9, 2015 13:20 IST

मध्य प्रदेशमधील वादग्रस्त व्यापमं घोटाळ्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात येईल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ९ - मध्य प्रदेशमधील वादग्रस्त व्यापमं ( व्यावसायिक  परीक्षा महामंडळ) घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात येईल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी २५ जुलै रोजी होणार आहे. 

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले. जबलपूर न्यायालयावर कडक शब्दात ताशेरे ओढत न्यायालय या प्रकरणातून आपले हात झटकत असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

तसेच मध्य प्रदेशच्या राज्यपालांना हटवण्याच्या मागणीच्या याचिकेवरही झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मध्य प्रदेश सरकार व केंद्र सरकारला नोटीस बजावली. गेल्या काही वर्षांमध्ये व्यापमं च्या माध्यमातून लाखो नोक-यांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. आत्तापर्यंत व्यापमंशी संबंधित आरोपी अथवा साक्षीदार असे मिळून सुमारे ४६ जणांचा गुढ मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेश सरकारमधले काही मंत्री या घोटाळ्यामध्ये तुरुंगाची हवा खात आहेत.

मागच्या एकाच आठवड्यात तीनजणांचा गूढ मृत्यू झाला आणि त्यामध्ये या प्रकरणाचा तपास करणा-या एका धडधाकट तरूण पत्रकाराचाही मृत्यू झाला. एकाच आठवड्यात झालेल्या या तीन मृत्यूंनतर मध्यप्रदेश सरकारवर प्रचंड दबाव आला. भाजपाच्याच खासदार उमा भारती यांनीही व्यापम घोटाळ्याची भीती वाटत असून कधी काय कानावर येईल सांगता येत नाही असं वक्तव्य केलं. विरोधक असलेल्या काँग्रेससह उमा भारतींनीही CBI चौकशीची मागणी केली.

अखेर जनमताच्या रेट्यापुढे नमत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आधी हायकोर्टाकडे नंतर सुप्रीम कोर्टाकडे या घोटाळ्याचा तपास CBI कडे देण्याची मागणी केली. अखेर सुप्रीम कोर्टाने या घोटाळ्याचा  तपास सीबीआयकडे दिला असून संपूर्णपणे सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआयच्या विशेष चौकशी समितीचा किंवा SIT चा तपास चालणार आहे.

दरम्यान, शिवराज सिंहांनी जी गोष्ट खूप आधी करायला हवी ती आत्ता केली असं सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच मध्यप्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांच्या मुलाने लाखो रुपये नोकरी लावण्यासाठी उमेदवारांकडून घेतल्याचा आरोप आहे. सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या संदर्भातही केंद्र व राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.