शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बालासोर रेल्वे अपघाताचे कारण समजले; 'कवच'मुळे दुर्घटना झाली नसल्याचा रेल्वे मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 12:16 IST

जबाबदार लोक कोण आहेत याची निश्चिती केली गेली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी याची चौकशी केली आहे. लवकरच याचा अहवाल समोर येईल. - अश्विनी वैष्णव

बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघाताचे कारण आता समोर आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या ट्रेनना कवच प्रणाली असती तर अपघात वाचले असते असे व्यक्तव्य केले होते. यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अपघाताचे कारण कवच प्रणाली नसल्याचे सांगितले आहे. 

ममता यांनी त्यांना जी माहिती होती त्यानुसार त्या बोलल्या आहेत. परंतू कवच प्रणाली नसणे हे अपघाताचे कारण नाहीय. तर हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्याने घडला आहे. ममता यांनी हा अपघात कोणत्या दुसऱ्या गोष्टीमुळे झालाय असे म्हटलेले नाही. जबाबदार लोकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे रेल्वेमंत्री म्हणाले. 

जबाबदार लोक कोण आहेत याची निश्चिती केली गेली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी याची चौकशी केली आहे. लवकरच याचा अहवाल समोर येईल. मोदींनी काल निर्देश दिले होते. एका ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. आता इलेक्ट्रीसिटी नीट करण्याचे काम सुरु आहे. आज रेल्वे ट्रॅक सुरु करण्याचे प्रयत्न आहेत, असे वैष्णव म्हणाले. 

दरम्यान, बालासोर रेल्वे दुर्घटनेच्या तपासासंदर्भात वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.  

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवMamata Banerjeeममता बॅनर्जी