शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

भारतात दोन टप्प्यांमध्ये होणार जातनिहाय जनगणना; १ मार्च २०२७ मध्ये होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:27 IST

बर्फाळ प्रदेशासाठी ऑक्टोबर २०२६चा मुहूर्त

चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जातींच्या आकडेवारीसह जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्च २०२७ पासून सुरू होणारी जनगणना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे.

केंद्र सरकारने १५ वर्षांपासून प्रलंबित जनगणना करण्याचा मुहूर्त काढला आहे. २१ महिन्यांनंतर अर्थात १ मार्च २०२७ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. यावेळी फॉर्ममध्ये जातीचाही कॉलम राहणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पाडली जाईल, असे गृह मंत्रालयाकडून आज जाहीर करण्यात आले आहे. हिमवृष्टीचा सामना करावा लागणाऱ्या जम्मू, काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासह उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होईल. जनगणना कायदा १९४८ च्या कलम ३ च्या तरतुदीनुसार, अधिसूचना अधिकृत राजपत्रात तात्पुरती १६ जून २०२५ रोजी प्रकाशित केली जाईल.

२०११ मध्ये लोकसंख्येत झाली १७.६४% वाढ

शेवटची जनगणना २०११ मध्ये करण्यात आली होती आणि ती सुद्धा दोन टप्प्यांत झाली होती. पहिल्या टप्प्यात घरांची यादी (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१०) आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची (०९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०११) माहिती गोळा करण्यात आली होती.

२०११ मध्ये देशाची लोकसंख्या

  • १ अब्ज २१ कोटी ०८ लाख ५४ हजार ९७७ एवढी होती.
  • आधीच्या जनगणनेनुसार त्यात १७.६४ टक्क्यांनी वाढ झाली होती.
  • २०११ मध्ये सर्वाधिक लोकसंख्या (१९९,८१२,३४१) असलेले राज्य उत्तर प्रदेश होते.
  • सर्वांत कमी (६४,४७३) लोकसंख्या लक्षद्वीपमध्ये होती.

एक अब्ज ४६ कोटी

वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्यू या संस्थेनुसार, या वर्षाच्या शेवटी भारताची लोकसंख्या १.५ अब्जपर्यंत पोहोचेल. भारतात एका दिवसात ६३,१७१ मुले जन्माला येतात तर मरणाऱ्यांची संख्या २६,६०४ आहे.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्र