शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
3
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
4
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
5
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
6
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
7
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
8
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
9
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
10
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
11
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
12
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
13
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
14
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
15
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
16
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
17
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
18
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
19
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
20
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख

भारतात दोन टप्प्यांमध्ये होणार जातनिहाय जनगणना; १ मार्च २०२७ मध्ये होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:27 IST

बर्फाळ प्रदेशासाठी ऑक्टोबर २०२६चा मुहूर्त

चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जातींच्या आकडेवारीसह जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्च २०२७ पासून सुरू होणारी जनगणना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे.

केंद्र सरकारने १५ वर्षांपासून प्रलंबित जनगणना करण्याचा मुहूर्त काढला आहे. २१ महिन्यांनंतर अर्थात १ मार्च २०२७ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. यावेळी फॉर्ममध्ये जातीचाही कॉलम राहणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पाडली जाईल, असे गृह मंत्रालयाकडून आज जाहीर करण्यात आले आहे. हिमवृष्टीचा सामना करावा लागणाऱ्या जम्मू, काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासह उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होईल. जनगणना कायदा १९४८ च्या कलम ३ च्या तरतुदीनुसार, अधिसूचना अधिकृत राजपत्रात तात्पुरती १६ जून २०२५ रोजी प्रकाशित केली जाईल.

२०११ मध्ये लोकसंख्येत झाली १७.६४% वाढ

शेवटची जनगणना २०११ मध्ये करण्यात आली होती आणि ती सुद्धा दोन टप्प्यांत झाली होती. पहिल्या टप्प्यात घरांची यादी (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१०) आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची (०९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०११) माहिती गोळा करण्यात आली होती.

२०११ मध्ये देशाची लोकसंख्या

  • १ अब्ज २१ कोटी ०८ लाख ५४ हजार ९७७ एवढी होती.
  • आधीच्या जनगणनेनुसार त्यात १७.६४ टक्क्यांनी वाढ झाली होती.
  • २०११ मध्ये सर्वाधिक लोकसंख्या (१९९,८१२,३४१) असलेले राज्य उत्तर प्रदेश होते.
  • सर्वांत कमी (६४,४७३) लोकसंख्या लक्षद्वीपमध्ये होती.

एक अब्ज ४६ कोटी

वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्यू या संस्थेनुसार, या वर्षाच्या शेवटी भारताची लोकसंख्या १.५ अब्जपर्यंत पोहोचेल. भारतात एका दिवसात ६३,१७१ मुले जन्माला येतात तर मरणाऱ्यांची संख्या २६,६०४ आहे.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्र