शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

इम्युनिटी वाढविण्यासाठी भारतीयांनी फस्त केले ३ लाख टन काजू; कोरोनानंतर रेकॉर्ड ब्रेक विक्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 12:33 IST

कोरोना महामारीच्या काळात लोकांचा रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे कल वाढला.

नवी दिल्ली-

कोरोना महामारीच्या काळात लोकांचा रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे कल वाढला. याच कारणामुळे सुकामेवा आणि इतर आरोग्य वर्धक पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाली. काजूच्या विक्रीतही कोरोना महामारीनंतर तब्बल दीडपट वाढ झाली आहे. 

काजू आणि कोकोआ विकास निर्देशालयानं (DCCD) दिलेल्या माहितीनुसार देशात काजूची वाढती विक्री पाहता उत्पादक देखील निर्यातीपेक्षा घरगुती बाजारावर लक्ष केंद्रीत करत आहेत. देशातील काजूची वार्षिक विक्रीत वाढ होऊन ३ लाख टनपर्यंत पोहोचली आहे. कोरोना महामारीआधी हाच आकडा २ लाख टन इतका होता. एका वर्षाआधी ब्रांडेड काजूची विक्री देखील ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. 

६० टक्के मागणी आयतीनं पूर्ण केली जातेदेशातील वापराच्या तुलनेत काजूचे उत्पादन वाढत नाही. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी आफ्रिकेतून कच्चे काजू आयात केले जातात. ६० टक्के मागणी केवळ आयातीतून भागवला जातो. २०२१-२२ मध्ये, भारताने ७.५ लाख टन काजूचे उत्पादन केले, तर या काळात कच्च्या काजूची आयात ९.३९ लाख टन होती. मात्र, त्यानुसार त्याचा वापर वाढत असल्याने लवकरच ही आयात दहा लाख टनांचा टप्पा पार करेल. देशातील काजूची प्रक्रिया करण्याची क्षमताही १८ लाख टनांवर पोहोचली आहे, जी एका वर्षापूर्वी १.५ दशलक्ष टन होती. काजूचा सर्वाधिक वापर उद्योगांमध्ये केला जातो, तर वैयक्तिक वापर फक्त १० ते १५ टक्के आहे.

सप्टेंबरपासून काजूचे दर वाढतीलकाजूच्या मागणीच्या अनुषंगाने दरात फारशी वाढ झालेली नाही, परंतु सप्टेंबरनंतर सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यानंतर त्याचे भाव वाढू लागतील. सध्या 950-1,200 रुपये किलोने विकले जाणारे प्रीमियम काजू 700-850 रुपये दराने विकले जात आहेत. एवढेच नाही तर सर्वसाधारणपणे काजूचा भाव आजही ५५० ते ६५० रुपये किलोपर्यंत आहे. उत्पादनांना आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात काजूच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे.

निर्यातीत 50 टक्के घटमहामारीनंतर काजूचा देशांतर्गत वापर वाढला पण निर्यात मात्र कमी होत आहे. याचे कारण व्हिएतनामसारख्या देशांनी काजूची निर्यात वाढवली आहे. आठ वर्षांपूर्वीपर्यंत, भारत दरवर्षी 1,00,000 टन काजू निर्यात करत असे, जे 2021-22 मध्ये 51,908 टनांवर आले आहे. याउलट, व्हिएतनाममध्ये स्थानिक वापर कमी झाला आहे आणि निर्यातीत वाढ होत आहे. व्हिएतनाम आता जगातील सर्वात मोठा काजू निर्यातदार देश बनला आहे. तिथून दर महिन्याला जेवढी काजूची निर्यात होते, तेवढी भारत आता वर्षभरात होते.

टॅग्स :saleविक्री