शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

इम्युनिटी वाढविण्यासाठी भारतीयांनी फस्त केले ३ लाख टन काजू; कोरोनानंतर रेकॉर्ड ब्रेक विक्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 12:33 IST

कोरोना महामारीच्या काळात लोकांचा रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे कल वाढला.

नवी दिल्ली-

कोरोना महामारीच्या काळात लोकांचा रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे कल वाढला. याच कारणामुळे सुकामेवा आणि इतर आरोग्य वर्धक पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाली. काजूच्या विक्रीतही कोरोना महामारीनंतर तब्बल दीडपट वाढ झाली आहे. 

काजू आणि कोकोआ विकास निर्देशालयानं (DCCD) दिलेल्या माहितीनुसार देशात काजूची वाढती विक्री पाहता उत्पादक देखील निर्यातीपेक्षा घरगुती बाजारावर लक्ष केंद्रीत करत आहेत. देशातील काजूची वार्षिक विक्रीत वाढ होऊन ३ लाख टनपर्यंत पोहोचली आहे. कोरोना महामारीआधी हाच आकडा २ लाख टन इतका होता. एका वर्षाआधी ब्रांडेड काजूची विक्री देखील ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. 

६० टक्के मागणी आयतीनं पूर्ण केली जातेदेशातील वापराच्या तुलनेत काजूचे उत्पादन वाढत नाही. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी आफ्रिकेतून कच्चे काजू आयात केले जातात. ६० टक्के मागणी केवळ आयातीतून भागवला जातो. २०२१-२२ मध्ये, भारताने ७.५ लाख टन काजूचे उत्पादन केले, तर या काळात कच्च्या काजूची आयात ९.३९ लाख टन होती. मात्र, त्यानुसार त्याचा वापर वाढत असल्याने लवकरच ही आयात दहा लाख टनांचा टप्पा पार करेल. देशातील काजूची प्रक्रिया करण्याची क्षमताही १८ लाख टनांवर पोहोचली आहे, जी एका वर्षापूर्वी १.५ दशलक्ष टन होती. काजूचा सर्वाधिक वापर उद्योगांमध्ये केला जातो, तर वैयक्तिक वापर फक्त १० ते १५ टक्के आहे.

सप्टेंबरपासून काजूचे दर वाढतीलकाजूच्या मागणीच्या अनुषंगाने दरात फारशी वाढ झालेली नाही, परंतु सप्टेंबरनंतर सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यानंतर त्याचे भाव वाढू लागतील. सध्या 950-1,200 रुपये किलोने विकले जाणारे प्रीमियम काजू 700-850 रुपये दराने विकले जात आहेत. एवढेच नाही तर सर्वसाधारणपणे काजूचा भाव आजही ५५० ते ६५० रुपये किलोपर्यंत आहे. उत्पादनांना आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात काजूच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे.

निर्यातीत 50 टक्के घटमहामारीनंतर काजूचा देशांतर्गत वापर वाढला पण निर्यात मात्र कमी होत आहे. याचे कारण व्हिएतनामसारख्या देशांनी काजूची निर्यात वाढवली आहे. आठ वर्षांपूर्वीपर्यंत, भारत दरवर्षी 1,00,000 टन काजू निर्यात करत असे, जे 2021-22 मध्ये 51,908 टनांवर आले आहे. याउलट, व्हिएतनाममध्ये स्थानिक वापर कमी झाला आहे आणि निर्यातीत वाढ होत आहे. व्हिएतनाम आता जगातील सर्वात मोठा काजू निर्यातदार देश बनला आहे. तिथून दर महिन्याला जेवढी काजूची निर्यात होते, तेवढी भारत आता वर्षभरात होते.

टॅग्स :saleविक्री