शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 06:39 IST

या निर्णयाचा फटका रोखीने बेकायदा खाजगी सावकारी करणाऱ्यांना बसेल. 

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : रुपये २०,००० पेक्षा जास्त रोखीत दिलेल्या रकमेच्या बदल्यात घेतलेले चेक  ‘कायद्याने अमलात आणता येण्याजोगे कर्ज’ मानले जाणार नाही, असे केरळ हायकोर्टाने म्हटले आहे. या निर्णयाचा फटका रोखीने बेकायदा खाजगी सावकारी करणाऱ्यांना बसेल. 

शाइन वर्गीस यांनी पी.सी. हारी यांना रुपये ९ लाखांची रक्कम रोखीने दिली आणि त्या बदल्यात चेक घेतले; परंतु खात्यात अपुरी रक्कम असल्यामुळे चेक वटले नाहीत. वर्गीस यांनी २०१३ मध्ये चेक बाउन्सप्रकरणी कलम १३८, नेगोशिएबल ॲक्टप्रमाणे खटला दाखल केला. मॅजिस्ट्रेट न्यायालयाने हारी यांना दोषी ठरविले. हायकोर्टात हारी यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला, ही रोखीची व्यवहार पद्धत कलम २६९ एसएस आयकर कायद्याचा भंग आहे.  त्यामुळे हा व्यवहारच बेकायदेशीर असून, याला कायदेशीर कर्ज गृहीत धरता येत नाही. 

हायकोर्टाचे  निरीक्षण

जर कोणी २०,००० रुपयांपेक्षा जास्त रोखीने दिले असतील आणि त्या बदल्यात दिलेला चेक बाउन्स झाला, तर अशा व्यवहारात रोख रक्कम देणाऱ्याची जबाबदारी राहील. हे व्यवहार बेकायदाच ठरतील आणि अशा बेकायदेशीर व्यवहारांसाठी फौजदारी न्यायालयांचे दरवाजे बंद राहतील. जेव्हा भारत सरकार देशातील नागरिकांकडून पूर्णपणे डिजिटल व्यवहार करण्याचे उद्दिष्ट ठेवते, त्यावेळी न्यायालय रोखीच्या व्यवहारांकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि त्यांना कायदेशीर मान्यता देऊ शकत नाही. - न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन 

 

टॅग्स :KeralaकेरळHigh Courtउच्च न्यायालय