शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

वडगाव अपघात प्रकरणी अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST

पुणे : सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलावर ,मंगळवारी ( दि.11) रोजी झालेल्या अपघातात ८ निष्पापांचा बळी गेला. १ ऑक्टोबर २०१० पासून कात्रज देहूरोड मार्गावर ६ पदरीकरणाचे काम सुरु आहे. ३१ मार्च २०१३ ला संपणे अपेक्षित असलेल्या या कामाला झालेल्या २. ५ वर्षांच्या विलंबामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असून या दिरंगाईस जबाबदार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांवर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सजग नागरिक मंचाने पोलीस आयुक्त के.के पाठक यांच्याकडे केली आहे. रस्त्यांच्या या कामाच्या दिरंगामुळे आज पर्यंत 150 जणांचे बळी गेले असल्याचेही वेलणकर यांनी मागणीत नमूद केले आहे.

पुणे : सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलावर ,मंगळवारी ( दि.11) रोजी झालेल्या अपघातात ८ निष्पापांचा बळी गेला. १ ऑक्टोबर २०१० पासून कात्रज देहूरोड मार्गावर ६ पदरीकरणाचे काम सुरु आहे. ३१ मार्च २०१३ ला संपणे अपेक्षित असलेल्या या कामाला झालेल्या २. ५ वर्षांच्या विलंबामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असून या दिरंगाईस जबाबदार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांवर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सजग नागरिक मंचाने पोलीस आयुक्त के.के पाठक यांच्याकडे केली आहे. रस्त्यांच्या या कामाच्या दिरंगामुळे आज पर्यंत 150 जणांचे बळी गेले असल्याचेही वेलणकर यांनी मागणीत नमूद केले आहे.
महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू असताना, रिफ्लेक्टर नसने . या रस्त्यावर लेन माकिंर्ग न करणे, मजबूत कठडे नसणे, रस्ते दुभाजक जागोजागी पंक्चर असणे तसेच सर्व्हीस रस्त्याचे काम रखडणे या सर्व गोष्टींमुळे मनुष्य व वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
या रस्त्यावर २० अपघात प्रवण जागा असल्याचे वाहतूक पोलिसांनी प्राधिकरणाच्या अधिका-यांना गेल्या दोन वर्षापासून वारंवार कळविण्यात येत आहे. मात्र. त्या मागणीनुसार, केवळ कंत्राटदाराला खलिते पाठविण्याशिवाय महामार्ग प्राधिकरणाने काही ही केले नाही. त्यामुळे प्राधिकरण व कंत्राटदार या दोघांच्या बेजाबदारपणा व दुर्लक्ष्यपणामुळेच प्राणघातक अपघातांची मालिका सुरु आहे.किमान आता तरी आपण जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांचेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे. तसेच वाहतूक नियंत्रण सोडून रस्त्याच्या कडेला फक्त असंघटीत दुचाकीस्वारांची 'शिकार' करणा-या आणी चारचाकी गाड्याच्या काळ्या काचांवर कारवाई करून पुरुषार्थ गाजविणा-्या परंतु 'अनधिकृत वाहतुकीकडे', 'अनधिकृत थांब्यांकडे', 'ओवरलोड' जड वाहनांकडे दुर्लक्ष्य करणा-्या वाहतूक पोलिसांवरही कारवाई करावी अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुध्दे यांनी केली आहे.
===================================