शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अशा स्थितीत दोन्ही डोस पुन्हा घ्यावे लागणार, जाणून घ्या पहिल्या डोसनंतर दुसरा कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 05:50 IST

...तर रोगप्रतिकारक शक्ती उशिराने निर्माण हाेणार ! तज्ज्ञ; दुसरा डाेस विलंबाने घेतल्याचा परिणाम

ठळक मुद्देराज्याचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, दोन्ही लसींकरिता दुसऱ्या डोसची मुदत ही वेगवेगळी आहे. कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला असेल तर चार आठवड्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईत सध्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू आहे. तर ४५ हून अधिक वय असणाऱ्या लाभार्थ्यांचे लसीकरण बंद आहे. परिणामी, दुसरा डोस घेण्यापासून वंचित राहिलेले लाभार्थी डोस मिळेल की नाही, या चिंतेत आहेत. दरम्यान, लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा काळ लांबणीवर पडणार असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले, मात्र दुसऱ्या डोसला उशीर झाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम हाेणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्याचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, दोन्ही लसींकरिता दुसऱ्या डोसची मुदत ही वेगवेगळी आहे. कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला असेल तर चार आठवड्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे, तर कोविशिल्डचा पहिला डोस घेतला असल्यास सहा ते आठ आठवड्यांनी दुसरा डोस घेतला पाहिजे. लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब झाल्यास कोणताही दुष्परिणाम नाही, मात्र रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होण्याचा काळ लांबणीवर जातो. राज्य शासनाकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर लसींची उपलब्धता होणे कठीण आहे, त्यामुळे दुसरा डोस घेणे बाकी असणाऱ्यांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे. 

लसीचा पहिला डोस हा रोगाविषयीची प्रतिकारकशक्ती शरीरात निर्माण करत असतो. त्यामुळे शरीरात प्रतिपिंड तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. पण, दुसरा डोस ही प्रक्रिया अधिक वेगवान करतो. त्यामुळे प्रतिपिंड आणि प्रतिकारशक्ती काम करण्याचे प्रमाण वाढवते. पहिला डोस संसर्गाचा धोका कमी करत असला तरी दुसरा डोसही आवश्यक आहे, अशी माहिती संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. राहुल तांबे यांनी दिली.

अशा स्थितीत दोन्ही डोस  पुन्हा घ्यावे लागणारलसीचा पहिला डोस घेतल्यानंतर १४ दिवसानंतर ५० टक्के प्रतिपिंड शरीरात निर्माण होतात, तर लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर हे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचते. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे दुसरे डोस लांबणीवर पडल्यास ते तीन महिन्यांपर्यंत घेण्याची मुदत आहे. या मुदतीत ते न घेतल्यास लाभार्थ्यांना पुन्हा दोन्ही डोस परत द्यावे लागतील. यापूर्वीही पोलिओ, काॅलरा यासारखे आजार आपण लसीद्वारे नियंत्रित केले. परंतु सध्या राज्यात लसीचा तुटवडा असल्यामुळे दुसरा डोस घेणे बाकी असणाऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, लसीचे डोस उपलब्ध झाल्यानंतर त्वरित यंत्रणेकडून प्राधान्याने लसीकरण केले जाईल.- रामकृष्ण लोंढे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (राज्य)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबई