शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांचं स्वप्न महागणार; सरकारच्या नव्या पॉलिसीमुळे कारची किंमत वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 11:57 IST

लोकसभेत भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी कारमध्ये एअरबॅग लावण्याबाबत सरकारला प्रश्न विचारला. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उत्तर दिले.

नवी दिल्ली - देशात वाढणारे रस्ते अपघात पाहता सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये एअरबॅग्स देणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार लवकरच कारमध्ये कमीत कमी ६ एअरबॅग (Airbag) अनिवार्य करणार आहे. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत अधिसूचना काढली जोईल. ऑटो कंपन्यांना हा नियम लागू असेल. संसदेत सरकारने याबाबत माहिती दिली. 

लोकसभेत भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी कारमध्ये एअरबॅग लावण्याबाबत सरकारला प्रश्न विचारला. त्यावेळी रस्ते वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी कारमध्ये ६ एअरबॅग्स बंधनकारक करण्याचा सरकार विचार करत आहे. लवकरच याबाबत प्रस्ताव आणला जाईल. याची अधिसूचना काढून नियम लागू करण्याचा विचार करत असल्याचं संसदेत म्हटलं. 

६ एअरबॅग्समुळे वाहनांच्या किंमती वाढणारनितीन गडकरींनी कारमध्ये लावण्यात येणाऱ्या एअरबॅगची किंमत सभागृहात सांगितली. जून महिन्यात मारुतीचे चेअरमन आरसी भार्गव म्हणाले की, सरकारच्या नव्या पॉलिसीमुळे ६ एअरबॅग्स असतील तर स्वस्त गाड्यांच्या किंमती वाढतील. छोट्या कारमध्ये ६ एअरबॅग्स लावले तर त्याची किंमत ६० हजारांपर्यंत जाईल. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी कार खरेदी करताना ६० हजार अधिक मोजावे लागतील असा दावा मारूतीने केला. परंतु नितीन गडकरींनी एका एअरबॅगची किंमत जाहीर केली. 

एका एअरबॅगची किंमत...गडकरींच्या म्हणण्याप्रमाणे एका एअरबॅगची किंमत ८०० रुपये इतकी आहे. मग कंपनी ग्राहकांकडून १५ हजार का घेते? एका एअरबॅगची किंमत ८०० रुपये आहे आणि ४ एअरबॅगची किंमत ३२०० रुपये होते. त्यासोबत काही सेंसर आणि सपोर्टिंग एक्सेसरीज इन्स्टॉल केल्या जातात. त्यामुळे एका एअरबॅगचा खर्च ५०० रुपयांनी वाढतो. त्याचा हिशोब पकडला तर एका एअरबॅगसाठी १३०० रुपये खर्च होऊ शकतो मग ६ एअरबॅगचे ७८०० रुपये खर्च होईल. मग कंपनी त्यासाठी ६० हजार अधिक का सांगतेय असा प्रश्न निर्माण होतो. सध्याच्या घडीला भारतात कारमध्ये पुढे बसणाऱ्यांसाठी एअरबॅग बंधनकारक आहे. आता सरकार कारमध्ये मागे बसणाऱ्यांसाठीही एअरबॅग लावणं बंधनकारक करणार आहे. देशात दरवर्षी ५ लाखापर्यंत रस्ते अपघात होतात. त्यात दीड लाख लोकांचा जीव जातो त्यामुळे सरकार ही नवी पॉलिसी आणत आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMarutiमारुती