शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:58 IST

नवरा-नवरीसह सात जणांनी कारमधून उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न समारंभातून परतणाऱ्या एका कारला अचानक भीषण आग लागली, त्यानंतर नवरा-नवरीसह सात जणांनी कारमधून उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. खंडवा-वडोदरा राष्ट्रीय महामार्गावर जैतापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपालपुरा गावाजवळ ही घटना घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा एका एर्टिगा कारचा टायर फुटल्यानंतर कारला भीषण आग लागली. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झालेल्या लग्नानंतर कारमधील लोक लोणारा गावातून बामनाला गावात परतत होते. गाडी गोपाळपुरा येथे पोहोचताच, गाडीचा टायर जोरात फुटला आणि काही क्षणातच गाडीतून धूर येऊ लागला.

जीव वाचवण्यासाठी लगेच बाहेर मारल्या उड्या

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, वधू-वर आणि इतर प्रवाशांनी ताबडतोब रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी लगेच बाहेर उड्या मारल्या. काही मिनिटांतच गाडीतील आगीने भयानक रूप धारण केलं. आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की त्या अनेक किलोमीटर अंतरावरून दिसत होत्या. स्फोटाच्या भीतीने राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालकांनी त्यांची वाहनं दोन किलोमीटर अंतरावर थांबवली.

गाडी पूर्णपणे जळून खाक

स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. अपघाताच्या वेळी महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता आणि घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले होते. जैतापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

टॅग्स :carकारfireआगmarriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेश