शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

निष्ठावानांना डावलून भलत्यांनाच उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 08:17 IST

घरचा अहेर देत काँग्रेसच्या मुस्लिम नेत्याने सोडला पक्ष

धनाजी कांबळे

हैैदराबाद : पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून पोपटपंची करणाऱ्यांना तिकीट दिले जात असल्याचा आरोप करून काँग्रेसचे तेलंगणातील वरिष्ठ मुस्लिम नेते अबिद रसूल खान यांनी टीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने याआधीच ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. दुसºया यादीत १० जणांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, यात मुस्लिमांतील निष्ठावान व प्रामाणिक इच्छुकांना डावलण्यात आले असून, उमेदवारी देताना मुस्लिमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप अबिद रसूल खान यांनी केला.

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष असलेल्या खान यांनी म्हटले आहे की, तिकीट वाटप करताना मुस्लिमांकडे दुर्लक्ष झाल्याने याला सामाजिक न्याय म्हणता येणार नाही. जुन्या दहा जिल्ह्यांमध्ये जिथे मुस्लिमांची ताकद आहे आणि आपले उमेदवार विजयी होऊ शकतील, अशा ठिकाणी मुस्लीम उमेदवारांना संधी द्यायला हवी. मात्र, तसे झाल्याचे दिसत नाही. अजूनही वेळ गेली नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल. आता काँग्रेसने जाहीर केलेल्या ७५ उमेदवारांमध्ये केवळ ४ मुस्लीम आहेत. त्यापैकी दोन जण तर नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झाले असून, एक जण अद्याप पक्षाचा सदस्यही नाही, असेही खान यांनी म्हटले आहे.

नलगोंडा, निजामाबाद आणि खम्मम या भागांत मुस्लिमांची ताकद ३० ते ३५ टक्के आहे. या ठिकाणी मुस्लीम समाजाचाउमेदवार द्यायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. मुस्लिमांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासाचा विचार होणार नसेल, तर भाजपामध्ये आणि आपल्या पक्षामध्ये काय फरक असा सवालही खान यांनी केला आहे.टीआरएस पक्षात प्रवेशकाँग्रेसमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असल्याचा आरोप करून वरिष्ठ नेते अबिद रसूल खान यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांनीही काँग्रेसला याच कारणावरून अलविदा केला.तीन जागांमुळे सीपीआय नाराजतेलंगणा विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीचे व के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांबरोबच टीडीपी, टीजेएस आणि सीपीआयशी महाआघाडी केली आहे. जागावाटप करताना सर्वांना सामावून घेण्याचा व न्याय देण्याचा प्रयत्न केला.सीपीआयला तीनच जागा सोडण्यात आल्याने त्या पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्त केसीआर सरकारच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या जनतेला पर्यायी सरकार देण्यासाठी काँग्रेससोबतच राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. सीपीआयला ५ जागा मिळाव्यात, अशी त्यांच्या नेत्यांची अपेक्षा होती.

 

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018TelanganaतेलंगणाElectionनिवडणूक