शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

निष्ठावानांना डावलून भलत्यांनाच उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 08:17 IST

घरचा अहेर देत काँग्रेसच्या मुस्लिम नेत्याने सोडला पक्ष

धनाजी कांबळे

हैैदराबाद : पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून पोपटपंची करणाऱ्यांना तिकीट दिले जात असल्याचा आरोप करून काँग्रेसचे तेलंगणातील वरिष्ठ मुस्लिम नेते अबिद रसूल खान यांनी टीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने याआधीच ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. दुसºया यादीत १० जणांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, यात मुस्लिमांतील निष्ठावान व प्रामाणिक इच्छुकांना डावलण्यात आले असून, उमेदवारी देताना मुस्लिमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप अबिद रसूल खान यांनी केला.

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष असलेल्या खान यांनी म्हटले आहे की, तिकीट वाटप करताना मुस्लिमांकडे दुर्लक्ष झाल्याने याला सामाजिक न्याय म्हणता येणार नाही. जुन्या दहा जिल्ह्यांमध्ये जिथे मुस्लिमांची ताकद आहे आणि आपले उमेदवार विजयी होऊ शकतील, अशा ठिकाणी मुस्लीम उमेदवारांना संधी द्यायला हवी. मात्र, तसे झाल्याचे दिसत नाही. अजूनही वेळ गेली नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल. आता काँग्रेसने जाहीर केलेल्या ७५ उमेदवारांमध्ये केवळ ४ मुस्लीम आहेत. त्यापैकी दोन जण तर नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झाले असून, एक जण अद्याप पक्षाचा सदस्यही नाही, असेही खान यांनी म्हटले आहे.

नलगोंडा, निजामाबाद आणि खम्मम या भागांत मुस्लिमांची ताकद ३० ते ३५ टक्के आहे. या ठिकाणी मुस्लीम समाजाचाउमेदवार द्यायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. मुस्लिमांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासाचा विचार होणार नसेल, तर भाजपामध्ये आणि आपल्या पक्षामध्ये काय फरक असा सवालही खान यांनी केला आहे.टीआरएस पक्षात प्रवेशकाँग्रेसमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असल्याचा आरोप करून वरिष्ठ नेते अबिद रसूल खान यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांनीही काँग्रेसला याच कारणावरून अलविदा केला.तीन जागांमुळे सीपीआय नाराजतेलंगणा विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीचे व के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांबरोबच टीडीपी, टीजेएस आणि सीपीआयशी महाआघाडी केली आहे. जागावाटप करताना सर्वांना सामावून घेण्याचा व न्याय देण्याचा प्रयत्न केला.सीपीआयला तीनच जागा सोडण्यात आल्याने त्या पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्त केसीआर सरकारच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या जनतेला पर्यायी सरकार देण्यासाठी काँग्रेससोबतच राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. सीपीआयला ५ जागा मिळाव्यात, अशी त्यांच्या नेत्यांची अपेक्षा होती.

 

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018TelanganaतेलंगणाElectionनिवडणूक