शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

भारतात कॅन्सरचा प्रकोप वाढणार, ICMR नं दिला इशारा; कारणही सांगितलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 18:07 IST

देशात येत्या तीन वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ वेगानं होणार असल्याचा दावा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) केला आहे.

नवी दिल्ली-

देशात येत्या तीन वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ वेगानं होणार असल्याचा दावा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) केला आहे. २०२५ पर्यंत देशात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये १२.७ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. वाढती आकडेवारी पाहता तज्ज्ञांनी धोका व्यक्त केला आहे. 

इंडियन काऊन्सिल ऑफ मोडिकल रिसर्चच्या माहितीनुसार २०२० मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रुग्णांचे आकडे १३.९२ लाख (जवळपास १४ लाख) इतके होते. २०२१ मध्ये यात वाढ होऊन १४.२६ लाख इतकी झाली. तर २०२२ मध्ये १४.६१ लाखांवर आकडा पोहोचला. 

कारण काय?तज्ज्ञांच्या मतानुसार देशात हृदय विकार आणि श्वसनासंदर्भातील आजारांपेक्षा कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. कॅन्सरच्या प्रसारासाठी अनेक मुद्दे कारणीभूत आहेत. यात वाढतं वय, बदलती जीवनशैली, व्यायाम आणि पौष्टिक आहाराची कमतरता यांचा समावेश आहे. 

अनेकदा लोकांना कॅन्सरच्या लक्षणांची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे वेळीच निदान होत नाही आणि उपचारातही उशीर होऊन जातो. लवकर उपचार न मिळाल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यासाठी लोकांमध्ये कॅन्सरच्या बाबतीत जागरुकता निर्माण करणं देखील महत्वाचं आहे. 

देशात कॅन्सरच्या बाबतीत पुरुषांचं प्रमाण अधिकगेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहता भारतात पुरुषांमध्ये सर्वाधिक तोंडाचा आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण आढळून आलं आहे. तर महिन्यांमध्ये सर्वाधिक ब्रेस्ट आणि गर्भाशयाचा कॅन्सरचे रुग्ण आढळून आले आहेत. 

बंगळुरू स्थित आयसीएमआर नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चनुसार (एनसीडीआयआर)  २०१५ ते २०२२ पर्यंत सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या आकड्यांमध्ये जवळपास २४.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. १४ वर्षाच्या लहान मुलांमध्ये लिम्फॉइड ल्युकेमिया म्हणजेच रक्ताशी निगडीत कॅन्सरचा धोका अधिक आहे. कॅन्सरमधून बचावासाठी जागरुकता निर्माण करणं गरजेचं आहे.

टॅग्स :cancerकर्करोग