शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

भारतात कॅन्सरचा प्रकोप वाढणार, ICMR नं दिला इशारा; कारणही सांगितलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 18:07 IST

देशात येत्या तीन वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ वेगानं होणार असल्याचा दावा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) केला आहे.

नवी दिल्ली-

देशात येत्या तीन वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ वेगानं होणार असल्याचा दावा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) केला आहे. २०२५ पर्यंत देशात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये १२.७ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. वाढती आकडेवारी पाहता तज्ज्ञांनी धोका व्यक्त केला आहे. 

इंडियन काऊन्सिल ऑफ मोडिकल रिसर्चच्या माहितीनुसार २०२० मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रुग्णांचे आकडे १३.९२ लाख (जवळपास १४ लाख) इतके होते. २०२१ मध्ये यात वाढ होऊन १४.२६ लाख इतकी झाली. तर २०२२ मध्ये १४.६१ लाखांवर आकडा पोहोचला. 

कारण काय?तज्ज्ञांच्या मतानुसार देशात हृदय विकार आणि श्वसनासंदर्भातील आजारांपेक्षा कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. कॅन्सरच्या प्रसारासाठी अनेक मुद्दे कारणीभूत आहेत. यात वाढतं वय, बदलती जीवनशैली, व्यायाम आणि पौष्टिक आहाराची कमतरता यांचा समावेश आहे. 

अनेकदा लोकांना कॅन्सरच्या लक्षणांची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे वेळीच निदान होत नाही आणि उपचारातही उशीर होऊन जातो. लवकर उपचार न मिळाल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यासाठी लोकांमध्ये कॅन्सरच्या बाबतीत जागरुकता निर्माण करणं देखील महत्वाचं आहे. 

देशात कॅन्सरच्या बाबतीत पुरुषांचं प्रमाण अधिकगेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहता भारतात पुरुषांमध्ये सर्वाधिक तोंडाचा आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण आढळून आलं आहे. तर महिन्यांमध्ये सर्वाधिक ब्रेस्ट आणि गर्भाशयाचा कॅन्सरचे रुग्ण आढळून आले आहेत. 

बंगळुरू स्थित आयसीएमआर नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चनुसार (एनसीडीआयआर)  २०१५ ते २०२२ पर्यंत सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या आकड्यांमध्ये जवळपास २४.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. १४ वर्षाच्या लहान मुलांमध्ये लिम्फॉइड ल्युकेमिया म्हणजेच रक्ताशी निगडीत कॅन्सरचा धोका अधिक आहे. कॅन्सरमधून बचावासाठी जागरुकता निर्माण करणं गरजेचं आहे.

टॅग्स :cancerकर्करोग