शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

भारतात कॅन्सरचा प्रकोप वाढणार, ICMR नं दिला इशारा; कारणही सांगितलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 18:07 IST

देशात येत्या तीन वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ वेगानं होणार असल्याचा दावा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) केला आहे.

नवी दिल्ली-

देशात येत्या तीन वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ वेगानं होणार असल्याचा दावा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) केला आहे. २०२५ पर्यंत देशात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये १२.७ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. वाढती आकडेवारी पाहता तज्ज्ञांनी धोका व्यक्त केला आहे. 

इंडियन काऊन्सिल ऑफ मोडिकल रिसर्चच्या माहितीनुसार २०२० मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रुग्णांचे आकडे १३.९२ लाख (जवळपास १४ लाख) इतके होते. २०२१ मध्ये यात वाढ होऊन १४.२६ लाख इतकी झाली. तर २०२२ मध्ये १४.६१ लाखांवर आकडा पोहोचला. 

कारण काय?तज्ज्ञांच्या मतानुसार देशात हृदय विकार आणि श्वसनासंदर्भातील आजारांपेक्षा कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. कॅन्सरच्या प्रसारासाठी अनेक मुद्दे कारणीभूत आहेत. यात वाढतं वय, बदलती जीवनशैली, व्यायाम आणि पौष्टिक आहाराची कमतरता यांचा समावेश आहे. 

अनेकदा लोकांना कॅन्सरच्या लक्षणांची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे वेळीच निदान होत नाही आणि उपचारातही उशीर होऊन जातो. लवकर उपचार न मिळाल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यासाठी लोकांमध्ये कॅन्सरच्या बाबतीत जागरुकता निर्माण करणं देखील महत्वाचं आहे. 

देशात कॅन्सरच्या बाबतीत पुरुषांचं प्रमाण अधिकगेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहता भारतात पुरुषांमध्ये सर्वाधिक तोंडाचा आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण आढळून आलं आहे. तर महिन्यांमध्ये सर्वाधिक ब्रेस्ट आणि गर्भाशयाचा कॅन्सरचे रुग्ण आढळून आले आहेत. 

बंगळुरू स्थित आयसीएमआर नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चनुसार (एनसीडीआयआर)  २०१५ ते २०२२ पर्यंत सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या आकड्यांमध्ये जवळपास २४.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. १४ वर्षाच्या लहान मुलांमध्ये लिम्फॉइड ल्युकेमिया म्हणजेच रक्ताशी निगडीत कॅन्सरचा धोका अधिक आहे. कॅन्सरमधून बचावासाठी जागरुकता निर्माण करणं गरजेचं आहे.

टॅग्स :cancerकर्करोग