शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मुख्यमंत्र्यांना अटक करता येते का? तुरुंगातून सरकार चालवता येते का? केजरीवालांना अटक झाल्यास काय होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 16:19 IST

Arvind Kejriwal News: ईडीकडून केजरीवाल यांना समन्स बजावण्यात आल्यानंतर आता मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याप्रमाणेच केजरीवाल यांच्यावरही अटकेची कारवाई होणार का? मुख्यमंत्र्यांना अटक करता येते का? तसेच असं झाल्यास दिल्लीचं सरकार तुरुंगातून चालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिल्ली मद्य परवाना वाटप घोटाळा प्रकरणामध्ये ईडीच्या तपासाची सुत्रे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचली आहेत. ईडीकडून केजरीवाल यांना समन्स बजावण्यात आल्यानंतर आता मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याप्रमाणेच केजरीवाल यांच्यावरही अटकेची कारवाई होणार का? मुख्यमंत्र्यांना अटक करता येते का? तसेच असं झाल्यास दिल्लीचं सरकार तुरुंगातून चालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर या प्रकरणातील शक्यतांवर आपण आज नजर टाकूयात.

दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, आपने सोमवारी आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये अटकेची कारवाई झाली तरी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी राहावे, असा आग्रह करण्यात आला. आतापर्यंत दिल्लीतील तथाकथित मद्य घोटाळ्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यास ते तुरुंगातून सरकार चालवू शकतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांना अटक करता येऊ शकते का? या प्रश्नाचं उत्तर राज्यघटनेमधून देण्यात आलेलं आहे. घटनेतील तरतुदींनुसार देशाचे राष्ट्रपती आणि राज्यपालांवर कार्यकाळ समाप्त होईपर्यंत दिवाणी आणि फौजदारी कारवाई करता येत नाही. मात्र ही सवलत पंतप्रधान आणि कुठल्याही मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेली नाही. राज्यघटनेतील कलम ३६१ नुसार भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल त्यांच्या कर्तव्यांचे निर्वहन करताना केलेल्या कुठल्याही कार्यासाठी कुठल्याही न्यायालयाप्रति उत्तरदायी नाही आहेत. या तरतुदीनुसार कार्यकाळादरम्यान राष्ट्रपती आणि राज्यपालांवर दीवाणी किंवा फौजदारी खटला चालवता येत नाही. मात्र ही सूट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेली नाही.

तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता ह्या कार्यकाळादरम्यान, पदावर असताना दोषी ठरवण्यात आलेल्या पहिल्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्याच प्रमाणे चारा घोटाळ्या प्रकरणी अटकेचं वॉरंट बजावण्यात आल्यानंतर बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र लालूप्रसाद यादव यांनी अटकेपूर्वी मुख्यमंत्रिपद राबडी देवी यांच्याकडे सोपवले होते. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अटकेची कारवाई झाली तरी त्यांनी राजीनामा देऊ नये, मुख्यमंत्रिपद सोडू नये, असा आग्रह आम आदमी पक्षाने धरला आहे. जर केजरीवाल यांना अटक झाली तर त्यांनी तुरुंगातून सरकार चालवावं, असे आपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अटक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता असते का? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र घटनेतील तरतुदीनुसार एखाद्या खटल्यात दोषी ठरल्यानंतरच मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्यात येऊ शकतं. जयललिता यांनी दोषी ठरण्यापूर्वी तीन वर्षे मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांसमोर व्यावहारिक आव्हानंही असतात. तसेच तपास सुरू असताना पदावर राहणे मुख्यमंत्र्याला कायदेशीररीत्या अनिवार्य नसते. याचा अर्थ अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली तरी जोपर्यंत या प्रकरणात ते दोषी ठरत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यापासून त्यांना कुणीही अडवू शकत नाही. मात्र यामध्ये काही व्यावहारिक अडथळे आहेत.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली