शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 09:37 IST

Rajasthan BJP chief Madan Rathore : राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराची धामधूम सुरु आहे.

जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराची धामधूम सुरु आहे. सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर राजस्थान भाजपचे प्रमुख मदन राठोड यांनी शनिवारी एक मोठे विधान केले आहे. जर खींवसर येथील आरएलपी खासदार हनुमान बेनिवाल यांच्या पत्नी कनिका बेनिवाल खींवसर पोटनिवडणुकीत पराभूत झाल्या, तर हनुमान बेलीवाल यांना त्याचा फायदा होईल, कारण कनिका बेनिवाल घरी राहून त्यांच्या मुलांची काळजी घेतील, असे मदन राठोड यांनी म्हटले आहे.

कनिका बेनीवाल या आरएलपीच्या उमेदवार असून १३ नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक लढवत आहेत. यावरून मदन राठोड यांनी निशाणा साधला. हनुमान बेनिवाल आणि त्यांची पत्नी दोघेही राजकारण करत राहिले तर त्यांच्या कुटुंबाचे काय होईल? असा सवाल मदन राठोड यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "मी सोशल मीडियावर पाहिलं की, ते (हनुमान बेनिवाल) काळजीत दिसत होते की, जर त्यांची पत्नी निवडणूक जिंकली नाही तर त्या आपल्या 'पीहार' (आईवडिलांच्या घरी) जातील. भाऊ, तुम्हाला इतकी भीती वाटत होती. मग तुम्ही (पोटनिवडणुकीत तुमच्या पत्नीला उतरवण्याचा) असा धोका का पत्करला?"

पुढे मदन राठोड  म्हणाले, "तुम्हाला माहीत आहे की, त्या जिंकू शकत नाहीत. पण माझा एक सल्ला आहे. हनुमान जी, तुमची पत्नी हरली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्या आपल्या आई-वडिलांच्या घरी जातील किंवा कुठेही. पण, त्या मुलांचा सांभाळ करतील. मुलांची काळजी घेणे महत्वाचे नाही का? जर तुम्ही दोघे राजकारण करत राहिल्यास कुटुंबाचे काय होईल? हे समजून घेणे आवश्यक आहे." 

काँग्रेसवरही हल्लाबोल मदन राठोड यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल करत काँग्रेसचे अनेक नेते जामिनावर असून राजकारण करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "काँग्रेस नेते जामिनावर आहेत. त्यांनी मोठे घोटाळे केले आणि त्यांना अटक करण्यात आली. ते जामिनावर आहेत आणि राजकारण करत आहेत." यावेळी मदन राठोड यांनी  सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, पी चिदंबरम आणि इतर नेत्यांची नावे घेऊन काँग्रेसवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024