शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 09:37 IST

Rajasthan BJP chief Madan Rathore : राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराची धामधूम सुरु आहे.

जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराची धामधूम सुरु आहे. सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर राजस्थान भाजपचे प्रमुख मदन राठोड यांनी शनिवारी एक मोठे विधान केले आहे. जर खींवसर येथील आरएलपी खासदार हनुमान बेनिवाल यांच्या पत्नी कनिका बेनिवाल खींवसर पोटनिवडणुकीत पराभूत झाल्या, तर हनुमान बेलीवाल यांना त्याचा फायदा होईल, कारण कनिका बेनिवाल घरी राहून त्यांच्या मुलांची काळजी घेतील, असे मदन राठोड यांनी म्हटले आहे.

कनिका बेनीवाल या आरएलपीच्या उमेदवार असून १३ नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक लढवत आहेत. यावरून मदन राठोड यांनी निशाणा साधला. हनुमान बेनिवाल आणि त्यांची पत्नी दोघेही राजकारण करत राहिले तर त्यांच्या कुटुंबाचे काय होईल? असा सवाल मदन राठोड यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "मी सोशल मीडियावर पाहिलं की, ते (हनुमान बेनिवाल) काळजीत दिसत होते की, जर त्यांची पत्नी निवडणूक जिंकली नाही तर त्या आपल्या 'पीहार' (आईवडिलांच्या घरी) जातील. भाऊ, तुम्हाला इतकी भीती वाटत होती. मग तुम्ही (पोटनिवडणुकीत तुमच्या पत्नीला उतरवण्याचा) असा धोका का पत्करला?"

पुढे मदन राठोड  म्हणाले, "तुम्हाला माहीत आहे की, त्या जिंकू शकत नाहीत. पण माझा एक सल्ला आहे. हनुमान जी, तुमची पत्नी हरली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्या आपल्या आई-वडिलांच्या घरी जातील किंवा कुठेही. पण, त्या मुलांचा सांभाळ करतील. मुलांची काळजी घेणे महत्वाचे नाही का? जर तुम्ही दोघे राजकारण करत राहिल्यास कुटुंबाचे काय होईल? हे समजून घेणे आवश्यक आहे." 

काँग्रेसवरही हल्लाबोल मदन राठोड यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल करत काँग्रेसचे अनेक नेते जामिनावर असून राजकारण करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "काँग्रेस नेते जामिनावर आहेत. त्यांनी मोठे घोटाळे केले आणि त्यांना अटक करण्यात आली. ते जामिनावर आहेत आणि राजकारण करत आहेत." यावेळी मदन राठोड यांनी  सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, पी चिदंबरम आणि इतर नेत्यांची नावे घेऊन काँग्रेसवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024