शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांना व्हायचे आहे बिहारचे केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 11:46 IST

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात उतरणार असून, बिहारमधील अरविंद केजरीवाल होऊ इच्छित आहेत; परंतु त्यांचा हा मार्ग खडतर आहे.

एस. पी. सिन्हापाटणा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात उतरणार असून, बिहारमधील अरविंद केजरीवाल होऊ इच्छित आहेत; परंतु त्यांचा हा मार्ग खडतर आहे. बिहारमध्येराजकारण करणे हे दिल्लीतील राजकारणापेक्षा जास्त कठीण आहे, असे जाणकारांचे मत आहे.

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या यशाचे कारण वेगळे आहे; परंतु बिहारच्या राजकारणात ठसा उमटविण्यासाठी जेपी आंदोलनाच्या धर्तीवर नवीन परिभाषा तयार करावी लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जेपी आंदोलनामुळे झालेला सत्ताबदल व केजरीवाल यांना मिळालेले यश या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु जातिधर्माची पाळेमुळे खोलवर रुजलेल्या बिहारच्या राजकारणात प्रशांत किशोर यांच्यासाठी रस्ता सोपा नसल्याचे समजले जात आहे.जाणकारांचे म्हणणे आहे की, जेपींनी ५ जून १९७४ रोजी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला होता. तेव्हा पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानात पाच लाख लोक जमा झाले होते. संपूर्ण क्रांतीमध्ये सात क्रांती समाविष्ट होत्या. 

आज किंवा उद्या रणनीती ठरविणार

प्रशांत किशोर यांची स्वत:च्या मूळ राज्यात राजकारणात उतरण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ते नीतीशकुमार यांचे रणनीतीकार व सल्लागार होते, त्या कालावधीत संवादाच्या वेळीही ‘जदयू’चे नेते व कार्यकर्त्यांना हे प्रकर्षाने जाणवले होते. काहींना तर असे वाटू लागले की, ते नितीशकुमार यांचे उत्तराधिकारी बनू इच्छित आहेत की काय? दोन वर्षांपूर्वी त्यांना जदयूमधून काढून टाकले होते. त्यांनी भाजप, जदयू, काँग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, आदी पक्षांसाठी वेगवेगळ्या काळासाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केलेले आहे. काही ठिकाणी त्यांना यश मिळाले, तर काही ठिकाणी ते सपशेल अयशस्वी झाले. अशा प्रकारे त्यांची ओळख मुख्यत्वे करून व्यावसायिक रणनीतीकार म्हणूनच राहिली आहे. 

  • आता ते बिहारच्या राजकारणात ठसा उमटवू इच्छित आहेत; परंतु बिहारमध्ये समाजवादी आंदोलनाची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत. 
  • बिहारच्या राजकारणातील आजचे प्रमुख चेहरे जेपी आंदोलनातूनच पुढे आलेले आहेत. मुख्यमंत्री नीतीशकुमार स्वत: कट्टर समाजवादी राहिलेले आहेत.
  • बिहारची आजची स्थिती अशी नाही की, येथे एखाद्या सुराज्य अभियानाला यश मिळेल. बिहारमधील गुंतागुंतीची सामाजिक संरचना व समाजवादाची घट्ट पाळेमुळे यांना प्रशांत किशोर यांना सामोरे जावे लागेल. अशा स्थितीत केजरीवाल होण्याचे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते. 
  • ते पुढील भूमिका काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ४ किंवा ५ मे रोजी ते पुढील रणनीती ठरविणार आहेत. सध्या ते चिंतन करीत आहेत.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरArvind Kejriwalअरविंद केजरीवालBiharबिहारPoliticsराजकारण