शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

प्रशांत किशोर यांना व्हायचे आहे बिहारचे केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 11:46 IST

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात उतरणार असून, बिहारमधील अरविंद केजरीवाल होऊ इच्छित आहेत; परंतु त्यांचा हा मार्ग खडतर आहे.

एस. पी. सिन्हापाटणा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात उतरणार असून, बिहारमधील अरविंद केजरीवाल होऊ इच्छित आहेत; परंतु त्यांचा हा मार्ग खडतर आहे. बिहारमध्येराजकारण करणे हे दिल्लीतील राजकारणापेक्षा जास्त कठीण आहे, असे जाणकारांचे मत आहे.

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या यशाचे कारण वेगळे आहे; परंतु बिहारच्या राजकारणात ठसा उमटविण्यासाठी जेपी आंदोलनाच्या धर्तीवर नवीन परिभाषा तयार करावी लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जेपी आंदोलनामुळे झालेला सत्ताबदल व केजरीवाल यांना मिळालेले यश या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु जातिधर्माची पाळेमुळे खोलवर रुजलेल्या बिहारच्या राजकारणात प्रशांत किशोर यांच्यासाठी रस्ता सोपा नसल्याचे समजले जात आहे.जाणकारांचे म्हणणे आहे की, जेपींनी ५ जून १९७४ रोजी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला होता. तेव्हा पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानात पाच लाख लोक जमा झाले होते. संपूर्ण क्रांतीमध्ये सात क्रांती समाविष्ट होत्या. 

आज किंवा उद्या रणनीती ठरविणार

प्रशांत किशोर यांची स्वत:च्या मूळ राज्यात राजकारणात उतरण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ते नीतीशकुमार यांचे रणनीतीकार व सल्लागार होते, त्या कालावधीत संवादाच्या वेळीही ‘जदयू’चे नेते व कार्यकर्त्यांना हे प्रकर्षाने जाणवले होते. काहींना तर असे वाटू लागले की, ते नितीशकुमार यांचे उत्तराधिकारी बनू इच्छित आहेत की काय? दोन वर्षांपूर्वी त्यांना जदयूमधून काढून टाकले होते. त्यांनी भाजप, जदयू, काँग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, आदी पक्षांसाठी वेगवेगळ्या काळासाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केलेले आहे. काही ठिकाणी त्यांना यश मिळाले, तर काही ठिकाणी ते सपशेल अयशस्वी झाले. अशा प्रकारे त्यांची ओळख मुख्यत्वे करून व्यावसायिक रणनीतीकार म्हणूनच राहिली आहे. 

  • आता ते बिहारच्या राजकारणात ठसा उमटवू इच्छित आहेत; परंतु बिहारमध्ये समाजवादी आंदोलनाची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत. 
  • बिहारच्या राजकारणातील आजचे प्रमुख चेहरे जेपी आंदोलनातूनच पुढे आलेले आहेत. मुख्यमंत्री नीतीशकुमार स्वत: कट्टर समाजवादी राहिलेले आहेत.
  • बिहारची आजची स्थिती अशी नाही की, येथे एखाद्या सुराज्य अभियानाला यश मिळेल. बिहारमधील गुंतागुंतीची सामाजिक संरचना व समाजवादाची घट्ट पाळेमुळे यांना प्रशांत किशोर यांना सामोरे जावे लागेल. अशा स्थितीत केजरीवाल होण्याचे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते. 
  • ते पुढील भूमिका काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ४ किंवा ५ मे रोजी ते पुढील रणनीती ठरविणार आहेत. सध्या ते चिंतन करीत आहेत.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरArvind Kejriwalअरविंद केजरीवालBiharबिहारPoliticsराजकारण