शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

प्रशांत किशोर यांना व्हायचे आहे बिहारचे केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 11:46 IST

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात उतरणार असून, बिहारमधील अरविंद केजरीवाल होऊ इच्छित आहेत; परंतु त्यांचा हा मार्ग खडतर आहे.

एस. पी. सिन्हापाटणा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात उतरणार असून, बिहारमधील अरविंद केजरीवाल होऊ इच्छित आहेत; परंतु त्यांचा हा मार्ग खडतर आहे. बिहारमध्येराजकारण करणे हे दिल्लीतील राजकारणापेक्षा जास्त कठीण आहे, असे जाणकारांचे मत आहे.

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या यशाचे कारण वेगळे आहे; परंतु बिहारच्या राजकारणात ठसा उमटविण्यासाठी जेपी आंदोलनाच्या धर्तीवर नवीन परिभाषा तयार करावी लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जेपी आंदोलनामुळे झालेला सत्ताबदल व केजरीवाल यांना मिळालेले यश या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु जातिधर्माची पाळेमुळे खोलवर रुजलेल्या बिहारच्या राजकारणात प्रशांत किशोर यांच्यासाठी रस्ता सोपा नसल्याचे समजले जात आहे.जाणकारांचे म्हणणे आहे की, जेपींनी ५ जून १९७४ रोजी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला होता. तेव्हा पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानात पाच लाख लोक जमा झाले होते. संपूर्ण क्रांतीमध्ये सात क्रांती समाविष्ट होत्या. 

आज किंवा उद्या रणनीती ठरविणार

प्रशांत किशोर यांची स्वत:च्या मूळ राज्यात राजकारणात उतरण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ते नीतीशकुमार यांचे रणनीतीकार व सल्लागार होते, त्या कालावधीत संवादाच्या वेळीही ‘जदयू’चे नेते व कार्यकर्त्यांना हे प्रकर्षाने जाणवले होते. काहींना तर असे वाटू लागले की, ते नितीशकुमार यांचे उत्तराधिकारी बनू इच्छित आहेत की काय? दोन वर्षांपूर्वी त्यांना जदयूमधून काढून टाकले होते. त्यांनी भाजप, जदयू, काँग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, आदी पक्षांसाठी वेगवेगळ्या काळासाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केलेले आहे. काही ठिकाणी त्यांना यश मिळाले, तर काही ठिकाणी ते सपशेल अयशस्वी झाले. अशा प्रकारे त्यांची ओळख मुख्यत्वे करून व्यावसायिक रणनीतीकार म्हणूनच राहिली आहे. 

  • आता ते बिहारच्या राजकारणात ठसा उमटवू इच्छित आहेत; परंतु बिहारमध्ये समाजवादी आंदोलनाची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत. 
  • बिहारच्या राजकारणातील आजचे प्रमुख चेहरे जेपी आंदोलनातूनच पुढे आलेले आहेत. मुख्यमंत्री नीतीशकुमार स्वत: कट्टर समाजवादी राहिलेले आहेत.
  • बिहारची आजची स्थिती अशी नाही की, येथे एखाद्या सुराज्य अभियानाला यश मिळेल. बिहारमधील गुंतागुंतीची सामाजिक संरचना व समाजवादाची घट्ट पाळेमुळे यांना प्रशांत किशोर यांना सामोरे जावे लागेल. अशा स्थितीत केजरीवाल होण्याचे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते. 
  • ते पुढील भूमिका काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ४ किंवा ५ मे रोजी ते पुढील रणनीती ठरविणार आहेत. सध्या ते चिंतन करीत आहेत.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरArvind Kejriwalअरविंद केजरीवालBiharबिहारPoliticsराजकारण