शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चनांच्या अहवालावर विश्वास ठेवू शकतो का? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 07:24 IST

नवी दिल्ली : सरकारने फेटाळलेल्या किंवा न स्वीकारलेल्या चौकशी आयोगाच्या अहवालाचा काय परिणाम होतो आणि अहवालाचा आधार असलेल्या इंपेरिकल ...

नवी दिल्ली :

सरकारने फेटाळलेल्या किंवा न स्वीकारलेल्या चौकशी आयोगाच्या अहवालाचा काय परिणाम होतो आणि अहवालाचा आधार असलेल्या इंपेरिकल डेटाचा घटनात्मक मुद्दा ठरवताना विचार केला जाऊ शकतो का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केला. 

दलित मुस्लिम आणि दलित ख्रिश्चनांच्या कोट्याचा प्रश्न विचारात घेताना न्यायालयाने रंगनाथ मिश्रा आयोगाच्या अहवालाचा संदर्भ दिला, ज्यात दलित मुस्लिम आणि दलित ख्रिश्चनांचा अनुसूचित जातींच्या यादीत समावेश करण्याची शिफारस केली होती. हा अहवाल सदोष असल्याचे सांगत सरकारने तो स्वीकारलेला नाही.

संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५० हा भेदभाव करणारा आहे आणि कलम १४ (कायद्यासमोरील समानता) आणि १५ चे (धर्म, वंश, जात इ.च्या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध) उल्लंघन करतो. संविधान म्हणून हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणाऱ्या अनुसूचित जातींमध्ये भेदभाव करतो, असा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत होते. 

संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५० (वेळोवेळी सुधारित) नुसार म्हणतो की, हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचा दावा करणारी कोणतीही व्यक्ती अनुसूचित जातीचा सदस्य असल्याचे मानले जाणार नाही.

याचिकाकर्त्यांपैकी एकाचे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायमूर्ती एस. के. कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, दलित ख्रिश्चन आणि दलित मुस्लिमांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याची शिफारस करणारा २००७ चा न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकारलेला नाही. सूची व भारताचे माजी मुख्य न्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन आयोग स्थापन केला आहे. आता, ते (सरकार) म्हणत आहेत की त्यांनी दुसरा आयोग नेमला आहे. पुरेशी सामग्री आहे ज्याच्या आधारे न्यायालय पुढे जाऊ शकते. सरकारने आयोग नेमण्यासाठी या न्यायालयाने वाट पहावी का?

अतिरिक्त महाधिवक्ता के. एम. नटराज केंद्रातर्फे म्हणाले की न्यायमूर्ती बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील आयोग आपले काम करत आहे आणि संबंधित सामग्री आणि डेटा गोळा केला जाणार आहे.‘न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग होता. त्याचा अहवाल तुम्ही तुमच्या समजदारीवर स्वीकारलेला नाही. तुम्ही दुसरा आयोग स्थापन केला. आयोगाच्या उत्तराची वाट पहावी का?” असे खंडपीठाने विचारले. या प्रकरणात ११ जुलैला पुन्हा सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय