शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळात काश्मीरचा प्रस्ताव सात मिनिटांत झाला होता मंजूर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 04:32 IST

जम्मू काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या प्रस्तावांना गेल्या सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवघ्या सात मिनिटांत मंजुरी मिळाली,

नवी दिल्ली - राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द करणे आणि या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या प्रस्तावांना गेल्या सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवघ्या सात मिनिटांत मंजुरी मिळाली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.सूत्रांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत हा विषय मांडताच सर्व मंत्र्यांनी बाके वाजवून व टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. ज्यांनी काश्मीर भारतात पूर्णांशाने सामील व्हावे यासाठी ‘प्राणाहुती’ दिली त्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचाच सैद्धान्तिक वारसा मानणारे बहुतांश मंत्री असल्याने हे दोन्ही विषय अत्यंत उत्साहात व भावनाविवश वातावरणात लगेच मंजूर करण्यात आले.या दोन्ही निर्णयांची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. हे विषय मंत्रिमंडळापुढे येईपर्यंत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा व आणखी काही मोजक्या व्यक्ती सोडल्या तर इतरांपासून ते पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आले होते. सूत्रांनी असेही सांगितले की, राज्यसभेत सरकारचे बहुमत नसूनही हे दोन्ही विषय मंजुरीसाठी आधी राज्यसभेत मांडणे हाही विचारपूर्वक आखलेल्या डावपेचांचा भाग होता. विरोधकांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन त्यातून होणाºया वैचारिक अनिश्चिततेचा फायदा घेणे हा त्यामागील हेतू होता.मंजुरीची आधीच व्यवस्थाकाही मोजक्या विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन त्यांची मते बाजूने नाहीत तरी विरोधात तरी पडणार नाहीत, याचीही व्यवस्था भाजप नेत्यांनी आधीच केली होती. त्यामुळे राज्यसभेत ते मोठ्या बहुमताने सहज संमत झाले. लोकसभेत भाजप व मित्रपक्षांचे बहुमत असल्याने तेथे मंजुरी मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, याची पंतप्रधानांना खात्री होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकार