शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मंत्रिमंडळात काश्मीरचा प्रस्ताव सात मिनिटांत झाला होता मंजूर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 04:32 IST

जम्मू काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या प्रस्तावांना गेल्या सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवघ्या सात मिनिटांत मंजुरी मिळाली,

नवी दिल्ली - राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द करणे आणि या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या प्रस्तावांना गेल्या सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवघ्या सात मिनिटांत मंजुरी मिळाली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.सूत्रांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत हा विषय मांडताच सर्व मंत्र्यांनी बाके वाजवून व टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. ज्यांनी काश्मीर भारतात पूर्णांशाने सामील व्हावे यासाठी ‘प्राणाहुती’ दिली त्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचाच सैद्धान्तिक वारसा मानणारे बहुतांश मंत्री असल्याने हे दोन्ही विषय अत्यंत उत्साहात व भावनाविवश वातावरणात लगेच मंजूर करण्यात आले.या दोन्ही निर्णयांची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. हे विषय मंत्रिमंडळापुढे येईपर्यंत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा व आणखी काही मोजक्या व्यक्ती सोडल्या तर इतरांपासून ते पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आले होते. सूत्रांनी असेही सांगितले की, राज्यसभेत सरकारचे बहुमत नसूनही हे दोन्ही विषय मंजुरीसाठी आधी राज्यसभेत मांडणे हाही विचारपूर्वक आखलेल्या डावपेचांचा भाग होता. विरोधकांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन त्यातून होणाºया वैचारिक अनिश्चिततेचा फायदा घेणे हा त्यामागील हेतू होता.मंजुरीची आधीच व्यवस्थाकाही मोजक्या विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन त्यांची मते बाजूने नाहीत तरी विरोधात तरी पडणार नाहीत, याचीही व्यवस्था भाजप नेत्यांनी आधीच केली होती. त्यामुळे राज्यसभेत ते मोठ्या बहुमताने सहज संमत झाले. लोकसभेत भाजप व मित्रपक्षांचे बहुमत असल्याने तेथे मंजुरी मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, याची पंतप्रधानांना खात्री होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकार